मुंबई : बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची दिल्लीत भेट झाल्याचा वा अशी भेट होणार असल्याच्या वृत्ताचा गरुड यांनी इन्कार केला. मायावती यांच्याशी आपले आजच बोलणो झाले असून, त्यांनीच ही बाब स्पष्ट केल्याचे गरुड म्हणाले.
बसपा-राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक घडवून आणली जात आहे. जागावाटपात जादा हिस्सा मिळावा यासाठी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी असे केले जात असावे, असे गरुड म्हणाले.
बसपा महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्व 288 जागा लढेल. 2क्क्9मध्येही आम्ही सर्व जागा लढविल्या होत्या. त्या वेळी बसपाला 1क् लाख 5क् हजार मते मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसपाला 13 लाख मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसारख्या पक्षांची 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मते घटली; पण बसपाची मात्र वाढली, याकडे गरुड यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)
समविचारी पक्षांना सोबत घेऊ
निवडणूक युतीबाबत बसपाशी चर्चा झालेली नाही; पण भाजपा-शिवसेनेला रोखण्याच्या दृष्टीने सर्वच समविचारी पक्षांना सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.