शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणला ब्रिटिशकालीन कंपनीचा खोडा; महसूल मंत्र्यांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 13:16 IST

मीरा भाईंदर मधील गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या मानीव अभिहस्तांतरणसाठी ब्रिटिशकालीन कंपनी नागरिकांची अडवणूक करत मनमानी पैसे उकळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धीरज परब / मीरा रोड - मीरा भाईंदर मधील गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या मानीव अभिहस्तांतरणसाठी ब्रिटिशकालीन कंपनी नागरिकांची अडवणूक करत मनमानी पैसे उकळत आहे. या मुळे इमारतीच्या जमिनी राहिवाश्यांच्या मालकीच्या झाल्या नसून हजारो कुटुंब संकटात सापडली आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या ब्रिटिशकालीन गुलामगिरीच्या जोखडातून सोडवा असे साकडे मीरा-भाईंदर हाऊसिंग फेडरेशन ने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून घातले आहे. 

स्वतंत्र भारतात मीरा भाईंदर हे एकमेव असे शहर आहे की येथील जमिनींवर आजही ब्रिटिश कालीन कंपनी हक्क सांगत आहे.   समुद्र व खाडीचे पाणी शेतात शिरू नये म्हणून ब्रिटिश काळात बांधबंदिस्ती ची जबाबदार रामचंद्र लक्ष्मण यांना दिली होती. नंतर त्याचे अधिकार इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने मिळवले. वास्तविक बांधबंदिस्तीच्या मोबदल्यात पिकाचा काही भाग शेतकऱ्यांनी द्यायचा होता. परंतु बांधबंदिस्ती केली गेली नाही व शेती सुद्धा आता पिकवली जात नाही. पण कंपनीने पिकाचा खंड घेण्या ऐवजी जमीनींवरच हक्क दाखल करून लगान वसुली चालवल्याचा आरोप सातत्याने होत आहे. 

जेणेकरून बांधकाम परवानगी घेण्या पासून शहरातील गृहनिर्माण संस्थांना इमारतीच्या जमिनींचे मानीव अभिहस्तांतरण करून घेण्यासाठी ह्या ब्रिटिश कालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीला मागेल त्याप्रमाणे जिझिया कर भरावा लागत आहे. 

मीरा भाईंदर शहरामध्ये जवळपास  सहा हजार गृहनिर्माण संस्था आहेत पण आजतागायत किमान पाच टक्के गृहनिर्माण संस्थाचे सुद्धा डीम कन्व्हेन्स झालेला नाही.  कारण इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीची नाहरकत आणण्याची जाचक मागणी संबंधित सरकारी कार्यालयातून केली जाते. सदर कंपनी नाहरकत साठी वाट्टेल तेवढी अवास्तव रक्कम मागते. गृहनिर्माण संस्था मधील राहिवाश्यांना इतकी मोठी रक्कम भरणे शक्य होत नसल्याने  डीम कन्व्हेयन्स ची प्रक्रिया पूर्ण होत नाही. जेणेकरून राहिवाश्यांना इमारतीच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत नसल्याने पुनर्विकासाचा मार्ग खुंटला असून हजारो कुटुंब न्याय हक्का पासून वंचित आहेत.  याबाबत महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू , मीरा-भाईंदर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण मधील सर्वात मोठ्या अडथळ्या बाबतची माहिती दिली.  इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या जाचातून नागरिकांना सोडवा असे साकडे घातले. यावेळी या प्रश्नावर सकारात्मक विचार करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्री यांनी दिले आहे. 

इमारत बांधते वेळी विकासकां कडून मोठी रक्कम घेऊन कंपनी नाहरकत देते. व आता त्याच इमारतीतील राहिवाश्यां कडून जमीन अभिहस्तांतरण साठी पुन्हा मनमानी पैसे उकळून लूट चालवल्याचा आरोप  पाटील यांनी केला आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक