शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फसविणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: August 1, 2014 01:16 IST

दर आठवड्यात पुरस्कार जिंकण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लाखो रुपयांनी लुबाडणाऱ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. एफआयआर रद्द करण्याची

गुन्हेगारांनो सावधान : एफआयआर रद्द करण्याची विनंती फेटाळलीनागपूर : दर आठवड्यात पुरस्कार जिंकण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लाखो रुपयांनी लुबाडणाऱ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. एफआयआर रद्द करण्याची आरोपींची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे.विजय शर्मा, जय सगने, सुरेंद्र नवरे, मोहम्मद साबीर मोहम्मद हनिफ, मोहम्मद इरफान अब्दुल रज्जाक, अफसर शाह लाल शाह व शंकर गायमुखे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सेवा मार्केटिंग नावाच्या संस्थेमार्फत ११ फेब्रुवारी २०१३ पासून दिग्रस व आजूबाजूच्या शहरांत भाग्यशाली सोडतीची योजना राबविली. दर आठवड्यात भाग्यशाली सोडत काढून चार ग्राहकांना पुरस्कार वितरित करण्याचे प्रलोभन त्यांनी नागरिकांना दिले. योजनेची मुदत १२ आठवड्यांची होती. योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना पहिल्या आठवड्यात ३०० व नंतर प्रत्येक आठवड्यात २०० याप्रमाणे एकूण २५०० रुपये भरायचे होते. सुमारे सहा हजार ग्राहक योजनेचे सदस्य झाले होते. आरोपींनी भाग्यशाली सोडती काढल्या, पण विजयी ग्राहकांना पुरस्कारच वितरित केले नाही. यामुळे शेख कलीम, पी. पी. पप्पुवाले, शेख अमान, मोहम्मद मोबीन व इस्माईल खान शेर खान यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ व इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपींनी योजना राबविण्यापूर्वी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी भाग्यशाली सोडतीचे कूपन छापले होते. दोन महिन्यानंतर त्यांचा भंडाफोड झाला. पुरस्कार मिळाले नसल्याने ग्राहकांना आपली आर्थिक पिळवणूक होत असल्याची उपरती झाली. यामुळे त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपींचा कट उघडकीस आणला.एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी व तक्रारकर्त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. आपसी सामंजस्याने वाद मिटविल्यामुळे एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती अर्जदारांनी केली होती.शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडून प्रकरणातील विविध महत्त्वाच्या मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यामुळे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी अर्ज फेटाळून लावला. हे प्रकरण केवळ पाच ग्राहकांशी संबंधित नाही. सुमारे सहा हजार ग्राहकांना आरोपींनी लुबाडले आहे. यामुळे एफआयआर रद्द करण्याची विनंती मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)