शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, द्राक्षे, केळीच्या आगारात साखर कारखानदारी मोडीत; शेतकरी वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 05:11 IST

sugar industry : कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत.

कांदे व केळीचे आगर असलेल्या उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून पै-पै भांडवल गोळा करून पाच-सहा दशकांपूर्वी सुरू झालेले अनेक सहकारी साखर कारखाने आज गैरव्यस्थापनामुळे मोडीत निघाले आहेत. कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. 

नाशिक : बहुतांश कारखाने  अडचणीतनाशिक जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून, चुकीचे नियोजन, भ्रष्टाचार आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे इतर सर्व कारखाने मागील दहा-बारा वर्षांपासून बंद आहेत. उसाचे आगर असलेल्या निफाड तालुक्यात रासाका आणि निसाका हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला निसाका १२ वर्षांपासून बंद असून, कर्जाच्या बोजामुळे मालमत्ता विकण्याची नामुश्की ओढावली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेला रासाका कारखाना सुरू करण्यासाठी सध्या निविदा काढण्यात आली आहे. वसाका कारखान्याचा मागील वर्षी गळीत हंगाम झाला नाही. गिरणा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद पडला आहे. नाशिक सहकारी साखर कारखानाही बंद असून, जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. 

धुळे : ऊस शहाद्यासह बडवानीकडे धुळे जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखाने कर्जबाजारीपणामुळे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांना नाशिक, शहादा आणि मध्य प्रदेशातील बडवाणीत ऊस विकावा लागतो.शिरपूर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ३५ कोटींच्या थकीत कर्जामुळे बंद आहे. पांझरा-कान सहकारी साखर कारखाना विक्रीची शिखर बँकेने फेरनिविदा काढली आहे. संजय साखर कारखाना विकला गेला आहे, तर शिंदखेडा सहकारी साखर कारखाना सुरूच झालेला नाही.

जळगाव : चारपैकी एकच कारखाना सुरूजळगाव जिल्ह्यातीत चार साखर कारखान्यांपैकी मुक्ताईनगरचा एकमेव कारखाना सुरू आहे. मधुकर, बेलगंगा व चोसाका बंद आहेत. सलग दुसरा गळीत हंगाम बंद ठेवण्याची वेळ मधुकरवर आली आहे. जिल्हा बँकेचे कर्ज, ४८ महिन्यांचे कामगारांचे वेतन, एफआरपी रक्कम थकली आहे. चोपडा कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. कामगारांचे ४० महिन्यांचे वेतन थकीत आहे. लोकसहभागातून ६५ कोटी रुपये उभे करून बेलगंगा कारखाना सुरू झाला, पुन्हा बंद झाला. 

अहमदनगर : देणी थकविल्याने दोन कारखाने बंदमागील वर्षीची शेतकऱ्यांची देणी न दिल्याने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा-२ साखर कारखाना, तर दिवंगत डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंदच आहे. जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. यापैकी सहकारी १४ तर खासगी साखर कारखाने ९ आहेत. साईकृपा-२ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७ कोटी, तर तनपुरे कारखान्याने २ कोटी ३८ लाख रुपये थकविले आहेत. तनपुरे साखर कारखाना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अधिपत्याखाली आहे. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू वर्षी गाळप सुरू करण्याची परवानगी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितली हाेती; परंतु शेतकऱ्यांची देणी थकविल्याने साखर आयुक्तांनी परवानगी दिली नाही.

(संकलन : संजय दुनबळे, अण्णा नवथर, राजेंद्र शर्मा, हितेंद्र काळुंखे)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती