शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कांदे, द्राक्षे, केळीच्या आगारात साखर कारखानदारी मोडीत; शेतकरी वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 05:11 IST

sugar industry : कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत.

कांदे व केळीचे आगर असलेल्या उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून पै-पै भांडवल गोळा करून पाच-सहा दशकांपूर्वी सुरू झालेले अनेक सहकारी साखर कारखाने आज गैरव्यस्थापनामुळे मोडीत निघाले आहेत. कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. 

नाशिक : बहुतांश कारखाने  अडचणीतनाशिक जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून, चुकीचे नियोजन, भ्रष्टाचार आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे इतर सर्व कारखाने मागील दहा-बारा वर्षांपासून बंद आहेत. उसाचे आगर असलेल्या निफाड तालुक्यात रासाका आणि निसाका हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला निसाका १२ वर्षांपासून बंद असून, कर्जाच्या बोजामुळे मालमत्ता विकण्याची नामुश्की ओढावली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेला रासाका कारखाना सुरू करण्यासाठी सध्या निविदा काढण्यात आली आहे. वसाका कारखान्याचा मागील वर्षी गळीत हंगाम झाला नाही. गिरणा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद पडला आहे. नाशिक सहकारी साखर कारखानाही बंद असून, जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. 

धुळे : ऊस शहाद्यासह बडवानीकडे धुळे जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखाने कर्जबाजारीपणामुळे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांना नाशिक, शहादा आणि मध्य प्रदेशातील बडवाणीत ऊस विकावा लागतो.शिरपूर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ३५ कोटींच्या थकीत कर्जामुळे बंद आहे. पांझरा-कान सहकारी साखर कारखाना विक्रीची शिखर बँकेने फेरनिविदा काढली आहे. संजय साखर कारखाना विकला गेला आहे, तर शिंदखेडा सहकारी साखर कारखाना सुरूच झालेला नाही.

जळगाव : चारपैकी एकच कारखाना सुरूजळगाव जिल्ह्यातीत चार साखर कारखान्यांपैकी मुक्ताईनगरचा एकमेव कारखाना सुरू आहे. मधुकर, बेलगंगा व चोसाका बंद आहेत. सलग दुसरा गळीत हंगाम बंद ठेवण्याची वेळ मधुकरवर आली आहे. जिल्हा बँकेचे कर्ज, ४८ महिन्यांचे कामगारांचे वेतन, एफआरपी रक्कम थकली आहे. चोपडा कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. कामगारांचे ४० महिन्यांचे वेतन थकीत आहे. लोकसहभागातून ६५ कोटी रुपये उभे करून बेलगंगा कारखाना सुरू झाला, पुन्हा बंद झाला. 

अहमदनगर : देणी थकविल्याने दोन कारखाने बंदमागील वर्षीची शेतकऱ्यांची देणी न दिल्याने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा-२ साखर कारखाना, तर दिवंगत डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंदच आहे. जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. यापैकी सहकारी १४ तर खासगी साखर कारखाने ९ आहेत. साईकृपा-२ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७ कोटी, तर तनपुरे कारखान्याने २ कोटी ३८ लाख रुपये थकविले आहेत. तनपुरे साखर कारखाना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अधिपत्याखाली आहे. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू वर्षी गाळप सुरू करण्याची परवानगी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितली हाेती; परंतु शेतकऱ्यांची देणी थकविल्याने साखर आयुक्तांनी परवानगी दिली नाही.

(संकलन : संजय दुनबळे, अण्णा नवथर, राजेंद्र शर्मा, हितेंद्र काळुंखे)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती