शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांमुळे रेल्वेला लागतोय ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:56 IST

शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो.

- महेश चेमटेमुंबई : शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो. सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल खोळंबतात तथापि महापालिकांच्या ढिल्या कारभारामुळे लोकलचे मोटरमन चिंतेत आहेत. रेल्वे फाटक बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पण संबंधित महापालिकांच्या वेळकाढूपणामुळे लोकलला ब्रेक लागत असल्याची माहिती समोर येत आहे.मुलुंड ते सीएसएमटी परिसरात फाटक नसल्यामुळे लोकलचा वेग जलद आणि सुरक्षित राखण्यात रेल्वे प्रशासनाला यश मिळाले आहे. हार्बर मार्गावर चुनाभट्टी येथे फाटक सुरू आहे. हे फाटक वाहनांसाठी जास्त काळ खुले राहिल्यास त्याचा परिणाम लोकल सेवांवर होतो. सद्य:स्थितीत चुनाभट्टी स्थानकातील फाटक बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वे रुळाला तडा या प्रकारांमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. तथापि उपनगरीय लोकल विस्कळीत झालेल्या आकडेवारींनुसार, ‘सरासरी १५ दिवसांतून एकदा सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि ३० दिवसांतून एकदा तडा जाणे’ हे प्रकार घडतात, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासगीत सांगितले. उलट ठाणे स्थानकातील पुढील फाटक उघडे असल्याने एक लोकल थांबली असता त्यामागील अन्य लोकल सेवांवर परिणाम होतो. गर्दीच्या वेळी दर चार मिनिटांनी लोकल धावते. एक लोकल फेरी खोळंबली अथवा विलंबाने धावली असता त्याचा परिणाम सर्व लोकलवर होऊन लोकलचे वेळापत्रक कोलमडते. दिवा स्थानकात दिवसातून ३० ते ४० वेळा फाटक उघडण्यात येते आणि बंद होते, तर ठाकुर्ली, टिटवाळा, शहाड, खारीगाव (कळवा) येथे प्रत्येकी १० ते १५ वेळा फाटकांची उघडझाप केली जाते. यामुळे दिवसभरातील सुमारे १०० फेºयांना लेटमार्क लागत असल्याची माहिती आली आहे.उपनगरीय लोकल मार्गांवर सद्य:स्थितीत शहाड, खारीगाव (कळवा), ठाकुर्ली, दिवा आणि टिटवाळा येथे रेल्वे फाटक सुरू आहे. हे फाटक बंद करण्यासाठी रेल्वेच्या अखत्यारीत असलेली सर्व कामे करण्यात आली. उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी ठाणे महानगरपालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांची आहे.मात्र या महापालिका रेल्वे फाटकांवरील आरओबीच्या (रोड ओव्हर ब्रिज) कामाबाबत वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत आहे. फाटक सुरू असल्यास लोकलसह एक्स्प्रेसला थांबावे लागते.च्सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फाटक उघडल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडते. चार मिनिटांसाठीदेखील लोकल एका जागी राहिल्यास संपूर्ण लोकलसेवांवर लेटमार्क लागतो.शहाड - काम२०१४ साली पूर्णशहाड स्थानकातील फाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत असलेले काम २०१४ साली पूर्ण केले. उर्वरित जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आहे. मात्र अद्यापही या महापालिकेकडून या कामाला गती मिळालेली नाही.खारीगाव (कळवा)- मार्च २०१७ मध्ये पूर्णखारीगाव येथील फाटक बंद करण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील काम मार्च २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. उरलेले काम ठाणे महानगरपालिका पूर्ण करणार आहे. या कामाला सुरुवात केली आहे, असे ठामपाचे म्हणणे आहे. तथापि, सकाळी आणि संध्याकाळी फाटक पार करण्यासाठी गाड्यांची रांगच लागल्याचे दिसून येते.ठाकुर्ली - जानेवारी२०१८ पर्यंत फाटक बंद होणारठाकुर्ली स्थानकातील फाटक उघडे राहिल्याने लोकलसह एक्स्प्रेसलादेखील खोळंबून राहण्याची वेळ आली आहे. रेल्वे अखत्यारीत असलेले काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. उर्वरित काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०१८ ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.टिटवाळा - महापालिकेचा जमीन हस्तांतरणाचा वादटिटवाळा स्थानकातील रेल्वे फाटकाबाबत जमीन हस्तांतरणाचा वाद आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या जागेच्या वादामुळे फाटक बंद करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, येथील रेल्वेच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण झालेली आहेत.दिवा :दिवा स्थानकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याला रेल-रोड क्रॉसिंगचीदेखील मंजुरी मिळाली आहे. सदर पुलाचे काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. मात्र अद्यापही ठामपाकडून काम हाती घेण्यात आलेले नाही.दिवा :दिवा स्थानकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याला रेल-रोड क्रॉसिंगचीदेखील मंजुरी मिळाली आहे. सदर पुलाचे काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. मात्र अद्यापही ठामपाकडून काम हाती घेण्यात आलेले नाही.उपनगरीय लोकल विस्कळीत झालेल्या आकडेवारींनुसार, ‘सरासरी १५ दिवसांतून एकदा सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि ३० दिवसांतून एकदा तडा जाणे’ हे प्रकार घडतात, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासगीत सांगितले. मात्र रोजच्या विस्कळीतपणाला रेल्वे फाटक जबाबदार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.लोकल सेवा वेळेत सुरू राहावी आणि रेल्वे रुळावरीलअपघात रोखण्यासाठी रेल्वे फाटक बंद करण्याचानिर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला.त्यासाठी दिवसा आणि रात्रकालीन ब्लॉक घेत रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण केली. उर्वरितकामे संबंधित महापालिकांची आहेत.ही कामे पूर्ण न झाल्याने संबंधित फाटक बंद केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे रेल्वे प्रशासनाला लोकल वेळापत्रकाप्रमाणे चालवणे जिकिरीचे होत आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्ये रेल्वे