शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

सीमावादात आठ गावे अंधारात!

By admin | Updated: February 4, 2015 00:52 IST

दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह

तेलंगणने दोन महिन्यांपूर्वी वीज कापली : महाराष्ट्राची वीज पोहोचलीच नाहीसंघरक्षित तावाडे - जिवती, (चंद्रपूर)दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह प्रति कुटुंब ५० रुपये वीज देयकाच्या रुपात घेऊन विजेचा पुरवठा केला आणि आता मात्र दोन महिन्यांपासून तो खंडितदेखील केला. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्याच्या (पूर्वी आंध्र प्रदेश) सीमेच्या वादात अडकलेल्या १४ पैकी सात ते आठ गावांतील नागरिकांची ही व्यथा आहे. देयकाची रक्कम न भरल्याचे कारण पुढे करीत त्यांना अंधारात ढकलले जात आहे तर अद्याप देयकच न पोहोचल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत महाराष्ट्र तेलंगण राज्याच्या सीमावादात या गावकरी भरडले जात असून महाराष्ट्र शासनाचा गचाळ कारभार यासाठी कारणीभूत आहे.जिवती तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त असून या गावांत दोन्ही राज्याच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पदमावती, कामतगुडा या गावांत सुरूवातीपासूनच आंध्र प्रदेश राज्याची वीज सुरू होती. आंध्रमधून तेलंगण वेगळे राज्य झाल्यानंतर या राज्याने वीज कापल्याने सध्या येथे मोठी अडचण निर्माण झाली आहे.या सातही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्राचे खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी येथील नागरिक जोपर्यंत डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीज कनेक्शन देता येणार नसल्याचे सांगितले.तर, बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी आताच आलो आहे, यासंदर्भात मला काहीच माहीत नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले आहेत.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणानेही वीज कापल्याने पीठ गिरणी, शेतातील मोटारपंप बंद झाले आहेत. अतिसंवेदनशील व दुर्गम असलेल्या या गावातील नागरिक अंधारात वास्तव्य करीत आहेत. परीक्षेच्या तोंडावर वीज कापल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.ग्रामस्थ म्हणतात...वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांकडून डिमांड अर्ज प्राप्त झाले नाही, असे नेहमी ऐकायला मिळते, पण हे सर्व चुकीचे आहे. आम्ही २५-३० ग्रामस्थ मिळून डिमांड अर्ज १८ महिन्यांपूर्वी भरले आहेत. पण आम्हाला डिमांड पावती अजूनही दिली नाही. दोन महिन्यांपासून आम्ही अंधारात असून कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींने गावात येऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.- उत्तम शंकर कराळे, ग्रामस्थ