अरविंद म्हात्रे, चिकणघर - आयुष्याचा जोडीदार निवडताना अत्यंत सतर्कता बाळगणार्या आजच्या उपवर मॉडर्न तरुणींच्या जगात अशा तरुणीही आहेत. ज्यांनी मुकबधीर आणि कर्णबधीर तरुणांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांना आपल्या आयुष्याचा जीवन साथी स्वीकारल्याचे सुखद दृष्य उंबर्डे येथे एका विवाहा प्रसंगी जमलेल्या वºहाडींना बघायला मिळाले. कल्याण जवळील उंबर्डे गावातील अनिल पाटील (२४) आणि प्रदिप पाटील (२२) हे दोघे सख्ये भाऊ असून दोघांना बोलता आणि एैकता येत नाही. दोघेही कर्णबधीर - मुकबधीर आहेत. मात्र ते उपवर झाल्याने त्यांच्या आई वडीलांनी दोघांसाठी उपवर वधूंचा शोध घेतला असता भाल गावातील हर्षदा आणि टेमघर येथील कविता या मुलींनी पालकांच्या संमतीने मूक-कर्णबधिरांशी विवाहास होकार दिला आणि नुकताच २२ मे रोजी त्यांचा विवाहसंपन्न झाला. विशेष म्हणजे दोघी मुली पहिल्या दहावी पास असून अनुरुप आहेत. तसेच दोन्ही वर पहिल्या श्रेणीत दहावी उर्त्तीण झालेले आहेत़ त्यांच्या हा निर्णय ग्रामिण भागात कौतुकाचा विषय ठरला आहे.
त्या दोघींनी मूक आणि कर्णबधिरांना वरले
By admin | Updated: May 30, 2014 02:29 IST