शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

दोन्ही देशमुखांची हांजी हांजी न केल्यामुळेच त्यांनी माझी प्रतिमा मलिन करून टाकली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:33 IST

शरद बनसोडे यांचा आरोप; विधानसभेसाठी मोहोळ मतदारसंघात संधी मिळाल्यास उभारणार

ठळक मुद्दे‘लोकमत’ भवनमध्ये बनसोडे यांनी आज सदिच्छा भेट दिली‘लोकमत फेसबुक लाईव्ह’च्या  माध्यमातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेआपण कोणाची हांजी हांजी केली नाही, राजकारणाला दुकानदारी केली नाही अशी अनेक बेधडक उत्तरे दिली

सोलापूर: ‘माझा इथं काही मुलगा येऊन निवडणुकीसाठी उभारणार नाही, अथवा माझा इथं कुठला कारखाना नाही. लोकं माझ्यावर प्रेम करताहेत. ‘मला काही राजकारण करायचं नाही, समाजकारण हा मुद्दा घेऊनच मी खासदार झालो, असे स्पष्ट करताना माजी खासदार शरद बनसोडे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन देशमुखांची मी हांजी हांजी न केल्यामुळे या दोघांनी माझी प्रतिमा मलिन केली. त्यामुळेच मला उमेदवारी मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. संधी मिळाल्यास मोहोळ मतदारसंघातून विधानसभेतून निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकमत’ भवनमध्ये बनसोडे यांनी आज सदिच्छा भेट दिली.  यावेळी ‘लोकमत फेसबुक लाईव्ह’च्या  माध्यमातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आपण कोणाची हांजी हांजी केली नाही, राजकारणाला दुकानदारी केली नाही अशी अनेक बेधडक उत्तरे दिली.

प्रश्न: पाच वर्षे आपण काम करूनही भाजपने आपली उमेदवारी का टाळली ?उत्तर: पक्षाची काही धोरणं असतात. हाच चेहरा पुन्हा द्यायचा का? किंवा नवा चेहरा दिला तर ग्रेस मिळेल का? असा पक्ष विचार करत असतो आणि दुसरा एक निकष म्हणजे आधी सर्व्हे केला जातो. त्यामुळे कदाचित निर्णय घेतला असावा.सोलापूरचे दोन मंत्री त्यांची प्रचंड गटबाजी. मला कोणाची हांजी हांजी करायची इच्छाच नव्हती आणि राजकारण हे काही मी काही दुकानदारी केलेली नाही.  या दोघांसमोर मला हांजी हांजी करणं जमलं नाही.

प्रश्न: म्हणजे कोण?  उत्तर: पालकमंत्री आणि बापू. त्यातल्यात्यात बापूंना वाटतंय की, आमच्या दारासमोर येऊन बसावं. 

प्रश्न: त्यांच्या भांडणाचं मूळ कारण काय?उत्तर: काय ते असेल पण मी या दोघांना पुढे वरचढ ठरेल याची कल्पना आली असणार आणि त्यामुळे त्यांनी  माझ्याबद्दलचे चित्र उभे केलेले असेल. 

प्रश्न: तुम्ही म्हणता या दोघांमध्ये प्रचंड गटबाजी आहे? (मध्येच प्रश्न तोड) उत्तर: मी म्हणत नाही, सारं सोलापूर म्हणतंय.

प्रश्न: मूळ कारण काय?उत्तर: पूर्वीपासूनच आहे. मला सांगा नगरसेवक वाटून घ्यायची ही काय पद्धत असते का? हे सोळा माझे.. हे ३२ माझे. हे काय नोकरं आहेत का तुमची!जनतेने भाजपचे म्हणून निवडून दिले आहे त्यांना. आज एकाने मिटींग बोलावली की दुसरे येत नाहीत. यांनी बोलावले तिकडचे येत नाहीत. अरे काय आहे काय हे!

प्रश्न : हे जे सारं काही चाललं त्याबद्दल एक खासदार म्हणून तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं का? उत्तर: पोहोचवलं होतं.

प्रश्न: कुणाशी बोललात..उत्तर: मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. 

प्रश्न: काय म्हणाले...उत्तर: सांगितले. त्या दोघांमध्ये समेट करा आणि प्रेस घेऊन सांगा. आम्ही प्रेस घेऊन सांगितलं होतं. 

प्रश्न: निष्पन्न काय झालं?उत्तर: काही होत नाही. त्यात संघाच्या मंडळींनीही प्रयत्न केला. भोजनाच्या निमित्ताने एकत्र आणले पण काही उपयोग झाला नाही. यांची तोंडं इकडं आणि त्यांची तिकडं आणि दोघेही मोबाईलमध्येच व्यस्त. कसा एकोपा साधला जाणार त्यांच्यामध्ये.

प्रश्न: असो.. तिकीट नाकारल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती?उत्तर: माझी पक्षाबद्दलची काही तक्रार नाही. त्यांनी मला खूप काही संधी दिली. पण सांगायचा मुद्दा असा की, माझा इथं काही मुलगा येऊन निवडणुकीसाठी उभारणार नाही. माझा इथं कुठला कारखाना नाही. लोकं  माझ्यावर प्रेम करताहेत. समाजकारण करतो मी राजकारण नाही. 

प्रश्न: माझा कारखाना नाही हा टोमणा कुणाला मारताय विजयकुमार देशमुखांना का सुभाष देशमुखांना?उत्तर: जेवढे काही राजकारणी आहेत आणि जे काही इनकमिंग आहेत, ते सगळे गनपॉर्इंटवर ठेवल्यामुळे येऊ लागले आहेत आणि जे काही टिकून आहेत ते पुढे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हे त्यांचं चाललं आहे. मला काय करायचंय? माझ्यानंतर मुलाला राजकारणात आणायचं नाही. 

प्रश्न: पक्षाबद्दल नाराज आहात का?उत्तर: मुळीच नाही. यापूर्वीच मी म्हणालोय, मला खूप काही दिलंय. पण प्रचाराच्या काळात माझी इच्छा असूनही मला सहभागी होता आलं नाही. कुणीच बोलावलं नाही.

प्रश्न: याबद्दल कोणाकडे खंत व्यक्त केली काय?उत्तर: नाही, पण आताचे उमेदवार दीड लाख मताधिक्याने आले त्यात आणखी भर टाकू शकलो असतो. 

प्रश्न: नूतन खासदारांचं अभिनंदन करण्याचं कर्तव्य तुम्ही बजावलं का?उत्तर: मी ट्राय केला कदाचित मोबाईलच्या व्यस्त नेटवर्कमुळे तो लागला नसावा, पण आता ते जेव्हा दिल्लीतून येतील त्यावेळी त्यांचा सत्कार निश्चित करेन. 

प्रश्न: गुरुंना संधी मिळाली म्हणून जयसिध्देश्वर महास्वामी खासदार झाले आता तुम्हाला आमदार बनण्याची संधी आली तर तुम्ही स्वीकारणार का? अन्य कोणत्या पक्षाकडून संधी दिली तर....?उत्तर: पक्षाने संधी दिली तर तयार असेन. 

प्रश्न: फेसबुक लाईव्हद्वारे आपण राष्टÑवादीत जाणार आहात काय असं विचारलं जातंय? आपण काय सांगाल?उत्तर : अनगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं राजन पाटील यांच्यासमवेत उपस्थित राहण्याचा योग आला. त्यांचे पुत्र बाळराजे यांच्याशी आपला संबंध आला. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटलं असावं. पण, तरी शेवटी कालायतस्मय नम: हा एक प्रकार असतो. काळाच्या ओघात काय दडलेलाय कुणास ठाऊक. 

प्रश्न: म्हणजे थोडक्यात वाटलं असावं आणि होऊ शकतो हे दोन्ही सारखं आहे असं म्हणायचं का?उत्तर : हे आपण काळावर सोपवू यात.

कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी विस्कळीतपणा आणला- दोन्ही देशमुखांचं तोंड वाकडं ना कायमच. जे काही ते कार्यकर्त्यांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करीत होते ते आमच्यासमोर पोहोचत होतं आणि त्या दोघांची भांडणं तर  सर्व सोलापूरला माहीत आहेत. मंत्री असलेल्या दोघांनी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड विस्कळीतपणा आणला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Bansodeशरद बनसोडेVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुखLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९