शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसची बैठक : आघाडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 02:33 IST

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

ठळक मुद्देमतविभाजन टाळण्यावर एकमत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक टिळक भवन, दादर येथे झाली. बैठकीत सरकारविरोधातील लढय़ाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनाही बैठकीत बोलावण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याची आर्थिक स्थिती, उद्योग व गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले. बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह अनेक नेते उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील भाजपा नेते दादासाहेब मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली. काही मुद्दय़ांची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे.-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Mumbaiमुंबईcongressकाँग्रेस