शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दोन्ही काँग्रेसची बैठक : आघाडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 02:33 IST

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

ठळक मुद्देमतविभाजन टाळण्यावर एकमत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक टिळक भवन, दादर येथे झाली. बैठकीत सरकारविरोधातील लढय़ाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनाही बैठकीत बोलावण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याची आर्थिक स्थिती, उद्योग व गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले. बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह अनेक नेते उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील भाजपा नेते दादासाहेब मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली. काही मुद्दय़ांची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे.-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Mumbaiमुंबईcongressकाँग्रेस