शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

दोन्ही काँग्रेसची बैठक : आघाडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 02:33 IST

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

ठळक मुद्देमतविभाजन टाळण्यावर एकमत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक टिळक भवन, दादर येथे झाली. बैठकीत सरकारविरोधातील लढय़ाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनाही बैठकीत बोलावण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याची आर्थिक स्थिती, उद्योग व गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले. बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह अनेक नेते उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील भाजपा नेते दादासाहेब मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली. काही मुद्दय़ांची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे.-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Mumbaiमुंबईcongressकाँग्रेस