शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सीमा प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा; म.ए. समितीच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्र सरकारला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 09:17 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख नारायण कापलकर म्हणाले, खानापूर तालुक्यातल्या दुर्गम भागात आजही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे;

मुंबई : ६५ वर्षे झाली तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या जखमा अजूनही बुजलेल्या नाहीत. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. समितीच्या खानापूर तालुका पदाधिकाऱ्यांनी मुंबईत विविध नेत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील,सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण व नारायण कापलकर यांचा समवेश होता.त्यानंतर शिष्टमंडळाने लोकमतच्या वरळी येथील कार्यालयाला भेट दिली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन गेल्या ६५ वर्षांतला मोठा पराभव असल्याचे त्यांनी मान्य केले. किमान येत्या निवडणुकीत तरी सीमाभागातील मराठी भाषिकांचा असा पराभव होऊ नये यासाठी मराठीप्रेमींनी पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राने त्यासाठी बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही आलो असल्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले.

भाषावार प्रांतरचनेमध्ये बहुसंख्य असूनही मराठी भाषिकांवर मोठा अन्याय झाला. तब्बल पन्नास वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये न्यायालयात केस दाखल करून आमच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु गेली १६ वर्षे ही केस जराही हलली नाही. त्याचवेळी मराठीची गळचेपी आणि कन्नड सक्ती वाढल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या लढ्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. लढा तेवत ठेवणारे अनेकजण काळाच्या पडद्याआड गेले. जेवढे मोजके उरलेत त्यांच्या डोळ्यादेखत तरी हा लढा यशस्वी व्हावा असे आम्हाला वाटते. यासाठी काही करा पण आम्हाला महाराष्ट्रात घ्या, अशी कळकळीची विनंती पाटील यांनी केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख नारायण कापलकर म्हणाले, खानापूर तालुक्यातल्या दुर्गम भागात आजही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे; परंतु आजही मराठी भाषिकांना दुय्यम स्थान दिले जाते. आज महाराष्ट्राने या प्रश्नाकडे पाठ फिरवली असल्याचे सांगून समितीच्या वतीने निधी उभारुन २२८ प्राथमिक शाळा व ३५ हायस्कूल चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर मराठी वाढवा मराठी टिकवा असे अभियान चालवतो. ग्रामीण भागात ग्रंथालये चालवत असून त्यामध्ये संगणकावर मराठीचे धडे दिले जातात. आजही आम्ही मराठीचे संगोपन चांगल्या प्रकारे करत आहोत. कर्नाटक सरकार आमच्याकडे सूडबुद्धीने पाहते त्याचवेळी महाराष्ट्र सरकारनेही आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. मराठी पालकांमध्येही धरसोड वृत्ती वाढली असून त्यांना आम्ही मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे कार्य अव्याहतपणे करत असल्याचे कापलकर म्हणाले.

पवार यांचा तोडगा१९९३ साली शरद पवार यांनी महाराष्ट्रातच प्रती बेळगाव स्थापन करण्याचा व मराठी भाषिकांना त्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत बोलताना समितीचे सचिव आबासाहेब दळवी म्हणाले, आजही खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीतरी तोडगा काढत असतील तर आम्हाला तो मान्य असेल. पण तो तोडगा हा न्यायालयात असलेल्या खटल्याशी सुसंगत असावा. तोडग्यानुसार काही पदरात पडत असेल तर आम्ही त्यासाठी थोडं मागे सरकायलाही तयार आहोत.

शब्द झाले मुकेमहाजन आयोगाचा अहवाल आम्हाला मान्य आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढलेला तोडगाही आम्हाला मान्य आहे. काही करा पण आम्हाला महाराष्ट्रात घ्या,असे सांगताना मुरलीधर पाटील यांचा कंठ दाटून आला. आवंढा गिळतच त्यांनी आपल्या भावनेला आवर घातली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र