मुंबई: मानखुर्द येथील गतिमंद मुलांच्या बालगृहात डिसेंबर २०१२मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीबद्दल चिल्ड्रेन्स एड सोसायटी (सीएसी) आणि चाइल्ड वेल्फअेर कमिटी (सीडब्ल्यूसी)च्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, हे ११ वर्षांनंतरही सांगू न शकल्याबद्दल राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असा संताप उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केला. या पार्टीमध्ये २० विशेष मुलींना बारबालांबरोबर डान्स करण्यास भाग पाडण्यात आले होते.
आम्ही ११ वर्षे जनहित याचिका प्रलंबित ठेवू शकत नाही. कारवाई केली आहे की नाही, तेवढेच सांगा, असे मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने बजावले. त्यावर सरकारी वकिलांनी माहिती घेण्यासाठी मुदत मागितली. त्यावर, “यासाठी ११ वर्षे घेतली? तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांची लाज वाटली पाहिजे. काय कारवाई करण्यात आली ते पाहतो, हे सांगण्याची तुमची आता हिंमत कशी होते? म्हणजे आणखी २५ वर्षे आम्ही याचिका प्रलंबित ठेवावी का? याचिका प्रलंबित ठेवण्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?” असा संताप न्यायालयाने व्यक्त केला.
बारबालांसोबत विशेष मुलींना नाचवलेया पार्टीसाठी दारू आणण्यात आली. बारबालांना बोलावण्यात आले आणि तोकड्या कपड्यांत डान्स करणाऱ्या बारबालांबरोबर २० विशेष मुलींना पहाटे ३:०० वाजेपर्यंत डान्स करण्यास भाग पाडण्यात आले होते, असे जनहीत याचिकेत म्हटले होते.
२०१४ मध्ये जनहित याचिका दाखलपार्टीनंतर ११ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात २०१४मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेद्वारे अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सीएसी आणि सीडब्ल्यूसीच्या अधिकाग़्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीचाही समावेश होता. याबाबत अनेक खंडपीठांनी वेगवेगळे निर्देश दिले, तरीही याचिका अजूनही प्रलंबित आहे.
उच्च न्यायालयाने फटकारलेतुम्ही चुकीचे वागणाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही. काय कारवाई केली, हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला कारवाई करावीच लागेल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले.