शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

बोंडअळीच्या पंचनाम्यात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:30 IST

महसूल व कृषी विभागाने केलेल्या कपाशीवरील बोंडअळीच्या पंचनाम्यात लागवडीच्या क्षेत्रात तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्राची तफावत असल्याचे उघड झाले आहे. कृषी विभागापेक्षा महसूल विभागाच्या क्षेत्रात १९ हजार हेक्टरचे क्षेत्र वाढल्याने तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिका-यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवण्यात येणा-या अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा अहवाल अजून तालुकास्तरावरच आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : महसूल व कृषी विभागाने केलेल्या कपाशीवरील बोंडअळीच्या पंचनाम्यात लागवडीच्या क्षेत्रात तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्राची तफावत असल्याचे उघड झाले आहे. कृषी विभागापेक्षा महसूल विभागाच्या क्षेत्रात १९ हजार हेक्टरचे क्षेत्र वाढल्याने तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिका-यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवण्यात येणाºया अहवालावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा अहवाल अजून तालुकास्तरावरच आहे.तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडून करण्यात आलेल्या बोंडअळीच्या पंचनाम्यात असा मोठा घोळ झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीपेक्षा महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर केलेल्या बोंडअळीच्या पंचनाम्यात तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कृषी विभागाचे अधिकारी गोंधळले आहेत. विशेष म्हणजे आता नेमकी आकडेवारी खरी कोणाची समजावी, असा पेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यातील १३५ गावात कपाशी पिकांची ऐन वेचणीत माती होऊन शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी पंचनामे नुकतेच पूर्ण केले. मात्र, वैजापूर तालुका कृषी कार्यालय व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनाम्यात कपाशीच्या पेरणी क्षेत्रात मोठी तफावत येत असल्याने अधिकारीसुद्धा गोंधळले आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तसेच लागवड योग्य क्षेत्र १ लाख ३४ हजार असून खरीप हंगामात यंदा प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १ लाख १६ हजार इतके होते. त्यामध्ये ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात कपाशीची पेरणी करण्यात आल्याचा अहवाल तालुका कृषि अधिकाºयांनी जिल्हा कृषि कार्यालयाला पाठवला आहे. मात्र, महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर मोबाइल अ‍ॅप व जीपीएस यंत्राणेद्वारे केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यात कपाशीचे क्षेत्र ९३ हजार हेक्टर भरत आहे. तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्र वाढल्याने आता नेमके आकडे खरे कोणाचे, असा प्रश्न अधिकाºयांसमोर उपस्थित झाला आहे. याविषयी तहसीलदार सुमन मोरे यांनी तातडीने तालुका कृषि अधिकारी विष्णू मोरे, गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांच्यासोबत बैठक घेऊन याविषयी चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही.१९ हजार हेक्टर क्षेत्राचा ताळमेळ बसेनाखरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर किती पेरणी झाली, याची माहिती कृषी विभागाकडून संकलित केली जाते. मात्र, तालुकास्तरावरून माहिती वेळेत व अचूक जात नसल्याने जिल्हा कार्यालयाचा ‘घोळ’ होत असतो. वैजापूरच्या तालुका कृषी कार्यालयाने जुलैच्या अहवालात तालुक्यात कपाशीचे क्षेत्र ७७ हजार हेक्टर पेरण्या झाल्याचे कळविले होते.महसूल विभागाने थेट शेतकºयांच्या बांधावर बोंडअळीच्या केलेल्या पंचनामा अहवालात अचानक त्यामध्ये वाढ होऊन ९३ हजार हेक्टर पेरणीचे क्षेत्र आले आहे. जर कागदावर पेरणीच्या आकडेवारीत घोळ होत असेल तर मोजणीत, पंचनाम्यात घोळ होत नसेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.आमची आकडेवारी खरी-कृषी अधिकारीतालुक्यात कपाशीचे क्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे, तसा पेरणी अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. मात्र, महसूल विभाग आमच्या आकडेवारी पेक्षा १९ हजार हेक्टर क्षेत्र जास्त दाखवत असून त्यांची आकडेवारीमध्ये कुठेतरी चूक होत आहे. आमचा पेरणी अहवाल बरोबर आहे, असे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.आम्ही थेट बांधावर पंचनामे केले -तहसीलदारशासनाचा आदेश आल्यानंतर तब्बल एक महिना महसूलच्या कर्मचाºयांनी शेतकºयांच्या बांधावर जावून बोंडअळीचे पंचनामे पूर्ण केले असून त्यामध्ये ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमची आकडेवारी चुकीची नाही, असे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.