शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

‘बोलावा विठ्ठल’ची सुरेल मेजवानी!

By admin | Updated: July 11, 2017 01:01 IST

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘राम कृष्ण हरी’च्या गजरातून भक्तिरसात न्हाऊन निघालेले रसिक... किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. भीमसेन जोशी यांच्या एकमेवाद्वितीय रचना सादर करीत गायकांनी वातावरणात भरलेले भक्तीचे रंग... ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.निमित्त होते ‘पंचम निषाद क्रिएटिव्हस’ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि लोकमत समूह माध्यम प्रायोजक असलेल्या ‘बोलावा विठ्ठल..’ या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीतसंध्येचे. गेली १२ वर्षे पंचम निषादतर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधूून ‘बोलावा विठ्ठल’ अभंगमय संध्येचे आयोजन केले जात आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, पं. जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित व आनंद भाटे यांनी अभंगसेवा सादर केली. या वर्षीचा कार्यक्रम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना समर्पित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाचे निवासस्थान म्हणजे पंढरपूर. प्रतिवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो विठ्ठलभक्त वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्या वेळी ते विठ्ठलाच्या स्तुतीत अनेक अभंग गात असतात. ते सारे अभंग १२ ते १९ व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोराकुंभार, संत जनाबाई यांनी रचलेले आहेत. ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैैफलीमध्ये या अभंगांच्या आठवणींना उजाळा मिळाला. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’मधून हरिनामाचा गजर करून संगीतसंध्येचा श्रीगणेशा केला. रघुनंदन पणशीकर यांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पद्मनाभा नारायणा’ या रचना सादर करत रसिकांना स्वरांमधून विठूरायाचे दर्शन घडवले. देवकी पंडित यांनी ‘मजवरी करी कृपा’, ‘संत भार पंढरीचा’ हे अभंग गाऊन वातावरण प्रफुल्लित केले. या रचनांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आनंद भाटे यांनी ‘जोहार माय बाप’, ‘अगा वैैकुंठीचा राया’ हे अभंग सादर केले. पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी स्वरचित ‘सौैभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘विठ्ठलैैया विठ्ठलैैया’ हे कानडी अभंग सादर केले. साई बँकर आणि भरत कामत (तबला), प्रकाश शेजवळ (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य), एस.आकाश (बासरी), निरंजन लेले (हार्मोनियम) यांनी सुरेख साथसंगत केली. >तरुण पिढीला संस्कृती-परंपरेच्या जवळ आणण्याचा प्रयत्नपंचम निषाद संस्थेचे अध्यक्ष शशी व्यास म्हणाले, ‘मी काही वर्षांपूर्वी किशोरीतार्इंना भेटलो होतो. ज्याप्रमाणे संतवाणीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याप्रमाणे अभंगवाणीला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्या वेळी कार्यक्रमाचे ‘तोचि नादू सुखरू’ हे शीर्षक बदलून सोपे करण्याचे सुचवले. तुम्ही गायला तयार असाल तर मी हा कार्यक्रम करायला तयार आहे,’ असे मी म्हटल्यावर ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैफलीची सुरुवात झाली. २००५ मध्ये पहिली मैफल रंगली. या वेळी किशोरीतार्इंनी गायन केले’. या आठवणींना उजाळा देत, व्यास म्हणाले, ‘भारतीय भक्तिसंगीत हे सगुण-निर्गुण असे विभागलेले आहे. परंतु, अभंग प्रकार या दोहोंचा उत्कृष्ट संगम आहे. ‘बोलावा विठ्ठल’ हा एक असा प्रयत्न आहे, यामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृती व परंपरेच्या अधिक जवळ आणेल. शिवाय, महाराष्ट्रातील महान संत संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर आणि बहिणाबाई यांनी अभंगातून जो संदेश दिला आहे, तोही तरुणाईपर्यंत पोहोचेल.’