शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

श्वेतपत्रिकेत विरोधकांवर बोट

By admin | Updated: April 3, 2015 02:40 IST

आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक स्थितीवर नेमके बोट ठेवण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून

संदीप प्रधान, मुंबई आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक स्थितीवर नेमके बोट ठेवण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून, राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. नैसर्गिक संकटामुळे आर्थिक शिस्त बिघडत असल्याने पीक विमा योजना अधिक आकर्षक व सक्षम करताना उत्पन्नाचे नवनवीन स्रोत शोधून काढण्याबाबतही त्यात भाष्य करण्यात येणार आहे.मागील सरकारच्या काळात कर्जाचा बोजा ३ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. त्यावर वर्षाकाठी २४ हजार कोटी रुपयांचे व्याज भरावे लागत आहे. राज्यात १९९५ ते ९९ या काळात युती सरकार असताना राज्यावरील कर्जाचा बोजा ४० हजार कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा मुद्दा निवडणुकीत गाजला होता. सत्तेवर येताच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढली होती. त्याच धर्तीवर आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका  पुढील आठवड्यात अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र या श्वेतपत्रिकेवर चर्चा केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या सध्या नागरी किंवा निमनागरी क्षेत्रात वास्तव्य करते. महापालिका क्षेत्रातील ज्या लोकांचे उत्पन्न चांगले आहे अशा लोकांकडूनही अनेकदा कर, दरवाढीला विरोध केला जातो. लोकांना चांगली सेवा, विकास हवा असेल तर खिशात हात घालण्याची तयारी ठेवावी लागेल, हे श्वेतपत्रिकेतून सूचित केले जाणार आहे. गतवर्षी राज्याची योजना ५१ हजार २२२ कोटी ५४ लाखांची होती. प्रत्यक्षात विकासाकरिता निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वर्षी ५४ हजार ९९९ कोटींची योजना सरकारने मांडली असली तरी प्रत्यक्षात उत्पन्नाची उद्दिष्टे साध्य करण्यात अनेकदा नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित अडचणी निर्माण होतात. राज्याच्या समतोल विकासासंबंधी डॉ. विजय केळकर समितीने सादर केलेल्या अहवालात राज्याच्या योजनेचे आकारमान वेगवेगळ्या करांच्या अथवा दरांच्या माध्यमातून ७५ ते ८० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना केलेली आहे. सरकारी योजनेचे आकारमान लागलीच एवढे वाढवणे अशक्य असले तरी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करणे अपरिहार्य आहे.