शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

By यदू जोशी | Updated: October 17, 2024 07:13 IST

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका 

यदु जोशी -मुंबई : विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तीन आघाड्यांवर काम केले जात आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्रपक्षांनाही बसू नये याची काळजी घेतली जात आहे. रा.स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.  जिथे नाराजी होऊ शकते असे ५२ मतदारसंघ भाजपने काढले आहेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेतली जात आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरले आहे त्यांना त्या भागातील भाजपचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. ज्यांचे तिकीट पक्के झाले त्यांना तसे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते, अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर चार दिवसांपासून फडणवीस यांनी ‘समजूत अभियान’ हाती घेतले आहे. 

जिथे गडबड होऊ शकते, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष दोनतीन प्रबळ दावेदारांपैकी एकाला तिकीट दिल्यानंतर इतर दोघांची समजूत काढणे, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे. काही अगदी बोटावर मोजण्याइतके  असे मतदारसंघ आहेत की जे २०१९ च्या वा आधीच्या निवडणुकीत भाजपकडे होते, पण आता युतीधर्म पाळण्यासाठी ते शिंदेसेना वा अजित पवार गटाला द्यावे लागत आहेत.

अशा ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्रपक्षांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही पाऊले उचलली जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या डॅमेज कंट्रोलसाठी अलीकडेच एक बैठक घेतली. ज्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपानंतर किंवा महायुतीच्या फॉर्म्युला निश्चितीनंतर गडबड होऊ शकते, असे मतदारसंघ शोधण्यात आले आणि त्या मतदारसंघातील भाजप, संघाच्या अत्यंत निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. 

एकतर कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी आधी घ्या, असे निर्देश देण्यात आले. समजा बंडखोरी झालीच तर त्याची झळ पक्षाला किती बसेल? बंडखोर उमेदवार किती मते घेऊ शकतो आणि बंडखोरामुळे जो फटका बसणार आहे तो कसा भरून काढता येऊ शकेल, या बाबत पक्षात चिंतन सुरू आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी