शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

By यदू जोशी | Updated: October 17, 2024 07:13 IST

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका 

यदु जोशी -मुंबई : विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तीन आघाड्यांवर काम केले जात आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्रपक्षांनाही बसू नये याची काळजी घेतली जात आहे. रा.स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.  जिथे नाराजी होऊ शकते असे ५२ मतदारसंघ भाजपने काढले आहेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेतली जात आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरले आहे त्यांना त्या भागातील भाजपचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. ज्यांचे तिकीट पक्के झाले त्यांना तसे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते, अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर चार दिवसांपासून फडणवीस यांनी ‘समजूत अभियान’ हाती घेतले आहे. 

जिथे गडबड होऊ शकते, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष दोनतीन प्रबळ दावेदारांपैकी एकाला तिकीट दिल्यानंतर इतर दोघांची समजूत काढणे, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे. काही अगदी बोटावर मोजण्याइतके  असे मतदारसंघ आहेत की जे २०१९ च्या वा आधीच्या निवडणुकीत भाजपकडे होते, पण आता युतीधर्म पाळण्यासाठी ते शिंदेसेना वा अजित पवार गटाला द्यावे लागत आहेत.

अशा ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्रपक्षांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही पाऊले उचलली जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या डॅमेज कंट्रोलसाठी अलीकडेच एक बैठक घेतली. ज्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपानंतर किंवा महायुतीच्या फॉर्म्युला निश्चितीनंतर गडबड होऊ शकते, असे मतदारसंघ शोधण्यात आले आणि त्या मतदारसंघातील भाजप, संघाच्या अत्यंत निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. 

एकतर कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी आधी घ्या, असे निर्देश देण्यात आले. समजा बंडखोरी झालीच तर त्याची झळ पक्षाला किती बसेल? बंडखोर उमेदवार किती मते घेऊ शकतो आणि बंडखोरामुळे जो फटका बसणार आहे तो कसा भरून काढता येऊ शकेल, या बाबत पक्षात चिंतन सुरू आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी