शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील पक्षाचं नुकसान भरून काढण्यासाठी भाजपची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 14:03 IST

अहमदनगरमध्ये पक्षाचं झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणींने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - विखे पाटील पिता-पुत्र, पिचड पिता-पुत्र यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. किंबहुना पक्षाला अहमदनगर जिल्ह्यात नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने नवीन शक्कल काढली आहे.

तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षाला फायदा होईल या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये घेतले. तर मधुकर पिचड यांना देखील आमदार पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र यातून काही साध्य झालं नाही. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या 7 व्हायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात ही संख्या तीनवर आली. यात भाजपचं मोठं नुकसान झालं.

दरम्यान अहमदनगरमध्ये पक्षाचं झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणींने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये दोन जिल्हाध्यक्ष देण्याचं नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शहर आणि ग्रामीणसाठी असे दोन जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षांची निवड प्रदेश पातळीवर घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते.