शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:39 IST

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर सर्वकाही व्यवस्थीत झालं असा समज महाराष्ट्रातील जनतेत गेला होता. मागील पाच वर्षांत एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फॉर्म्युला देखील ठरला होता. मात्र भाजपच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला धक्का बसणार असून त्यामुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला १४४-१४४ जागांचा फॉर्म्युला भाजप-शिवसेना यांच्यात निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर भाजपकडून घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी फॉर्म्युला १३५-१३५ असा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून उर्वरित १८ जागा घटक पक्षांना देण्यास भाजप उत्सुक आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद असं धोरण ठरलं असलं तरी भाजप नेत्यांच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या स्वप्नाला सुरंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या १८ जागा या भाजपच्या चिन्हावर लढवाव्या अस भाजपच म्हणणं आहे. त्यामुळे सहाजिकच १३५-१३५ या फॉर्म्युल्याला खीळ बसणार असून हा फॉर्म्युला १३५-१५३ असा होणार आहे. या दाव्यामुळे युतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी घटक पक्षांच्या अनेक उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्याचे कारणही तसच असून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच हवा आहे.