शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:39 IST

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर सर्वकाही व्यवस्थीत झालं असा समज महाराष्ट्रातील जनतेत गेला होता. मागील पाच वर्षांत एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फॉर्म्युला देखील ठरला होता. मात्र भाजपच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला धक्का बसणार असून त्यामुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला १४४-१४४ जागांचा फॉर्म्युला भाजप-शिवसेना यांच्यात निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर भाजपकडून घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी फॉर्म्युला १३५-१३५ असा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून उर्वरित १८ जागा घटक पक्षांना देण्यास भाजप उत्सुक आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद असं धोरण ठरलं असलं तरी भाजप नेत्यांच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या स्वप्नाला सुरंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या १८ जागा या भाजपच्या चिन्हावर लढवाव्या अस भाजपच म्हणणं आहे. त्यामुळे सहाजिकच १३५-१३५ या फॉर्म्युल्याला खीळ बसणार असून हा फॉर्म्युला १३५-१५३ असा होणार आहे. या दाव्यामुळे युतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी घटक पक्षांच्या अनेक उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्याचे कारणही तसच असून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच हवा आहे.