शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची पहिली चाल यशस्वी

By admin | Updated: September 19, 2016 01:30 IST

भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पहिल्याच राजकीय खेळीत गेली सलग १० वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली

राजू इनामदार,

पुणे- केंद्र व राज्यातील सत्तेनंतर आता महापालिकेवर झेंडा रोवायचाच, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पहिल्याच राजकीय खेळीत गेली सलग १० वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली आहे. काँग्रेस, शिवसेना व मनसेही भाजपाच्या या आक्रमक पवित्र्याने गांगरून गेले आहेत. नवा डाव रचण्याऐवजी या पक्षांना भाजपाची आता पुढची चाल काय असेल, या चिंतेने ग्रासले आहे.राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग केल्यामुळे महापालिका निवडणुकीचे सूत्रच बदलले आहे. त्यात आपण बसायचे कसे, असा प्रश्न अनेक विद्यमान नगरसेवकांना पडला आहे. ८० ते ९० हजार मतदारांचा सामना करायचा तर वैयक्तिक संपर्काबरोबरच पक्षही प्रबळ पाहिजे, याची खूण पटली असल्यामुळे अनेकांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. त्यात सर्वाधिक संख्या आहे ती मनसेच्या नगरसेवकांची हे सर्वश्रुत आहे, मात्र आमचा वाडा चिरेबंदी म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा प्रवेश भाजपाने घडवून आणल्यामुळे काँग्रेससह बाकीच्यांनाही आपल्या भिंती तपासून पाहाव्या लागत आहेत. मनसे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा प्रवेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्यामुळे भाजपाची निवडणुकीची सूत्रे थेट मुंबईतूनच हलतील, अशी चिन्हे दिसत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी सबळ उमदेवारांबरोबरच धर्म, जात, पैसे, नातेसंबंध असे अनेक घटक लागतात. या सगळ्यात आतापर्यंत बलवान होते ते काँग्रेस व राष्ट्रवादीच! भाजपा आता त्यामध्ये त्यांच्याबरोबरीनेच नव्हे तर तेवढ्याच समर्थपणे उभा राहत आहे, असे मुंबईतील प्रवेशाच्या घटनेवरून दिसते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का बसला आहे तो त्याचा. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अधिक घायाळ झाली आहे. >पक्षांतर घडवून संजय काकडेंनी दाखवली चुणूक कोपर्डी प्रकरणात निघत असलेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चामुळे या समाजाचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होते आहे. पुणे शहरात हा समाज एकवटला आहे तो पुण्याभोवतालच्या उपनगरांमधून. राष्ट्रवादीचे सध्याचे सर्वाधिक नगरसेवक तिथूनच निवडून आले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीची यंदाच्या निवडणुकीत मदार आहे ती तिथूनच! भाजपाकडे नेमक्या याच चेहऱ्याची उणीव होती. ते ओळखूनच की काय, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील त्या प्रवेश कार्यक्रमाची सगळी जबाबदारी खासदार संजय काकडे यांच्यावर दिली. किंबहुना हा प्रवेश कार्यक्रम त्यांनीच घडवून आणला असे बोलले जात आहे.संजय काकडे राज्यसभेचे खासदार आहेत. अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांना सेना भाजपाच्या सदस्यांनी मदत केली. राजकारणाचे वारे ओळखून त्यांनी भाजपाचे सहयोगी सदस्य होणे पसंत केले. गेल्या काही दिवसांत ते पुण्याच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तसे सांगितले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन नगरसेवकांचे पक्षांतर घडवून आणून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. पक्षाचे बळ वाढविण्याबरोबरच त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीलाही धक्का दिला. आमच्याकडे येण्यासाठी बरेच जण तयार आहेत, असे भाजपाकडून वारंवार सांगण्यात येत असते. त्यात तथ्यांश असल्याचे या पक्षांतराने सिद्ध केले आहे. त्यामुळे आता कोण कोण येणार, त्याची चर्चा भाजपा करीत आहे, तर अन्य पक्षांच्या नेत्यांवर आपल्यातून कोण कोण जाणार, त्याचे अंदाज लढवत बसण्याची वेळ आली आहे.याही वेळी आमचीच सत्ता अशा आविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बचावात्मक पवित्र्यात जाणे भाग पडले आहे. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत संबंधित नगरसेवकावर पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करू, असे जाहीर केले. त्यातूनच मग नगरसेवक दिनेश धाडवे यांनी आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असे पत्र महापौर प्रशांत जगताप यांना दिले. मात्र निवडणूक लढविण्यास अपात्र होऊ नये, यासाठी केलेली ती केवळ तांत्रिक बाब झाली. भाजपाच्या या आक्रमकतेचा प्रतिकार कसा करायचा, याची खलबते आता राष्ट्रवादीच्या गोटात रंगू लागली आहेत.>राष्ट्रवादी व भाजपा यांच्यातच लढतपालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादीबरोबर असलेल्या काँग्रेसची शहरातील अवस्था यथातथाच आहे. नवे अध्यक्ष रमेश बागवे त्यात चैतन्य आणण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. मात्र त्यांना पक्षाच्या नेत्यांची हवी तशी साथ मिळत नाही. तरीही काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंख्येने बराच असल्याने पक्षाचे अस्तित्व लक्षणीय आहे़ त्यामुळेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली तर जागेवरून त्यांच्यात वाद होणार हे आताच दिसते आहे.शहरातील सेनेचे बळ भाजपापेक्षा कधी काळी जास्त होते, मात्र तो आता इतिहासच झाला आहे. भाजपाने बरोबर घेतले नाही तर सेनेची अवस्था निवडणुकीत फार चांगली असेल, असे काही दिसत नाही. मनसेची घरघर सुरू झाली आहे. तब्बल २९ नगरसेवकांच्या या पक्षात सध्या कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था आहे. थेट नाव घेऊन कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात जाईल, याची जाहीर चर्चा होत असते, यावरून मनसेची वाटचाल येत्या निवडणुकीत कशी राहील, याचा अंदाज बांधता येतो. राष्ट्रवादी व भाजपा यांचाच जोरदार सामना होण्याची दाट शक्यता असून त्याच्या पहिल्या टप्प्यात सध्या तरी भाजपाने बाजी मारली असल्याचे दिसत आहे.