शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:33 IST

दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने शानदार कामगिरी केली होती. मागील पाच वर्षांत भाजपने राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्थेच्या असो वा विधान परिषदांच्या जांगासाठीची लढत असो सगळीकडे चांगली कामगिरी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असताना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे दानवेंच्या कामगिरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रीयमंत्रीपदात रस नसल्यामुळे दानवे यांची केंद्रातून राज्यात रवानगी करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्याच कार्यकाळात मराठा, ओबीसी आणि दलित मोर्चांचा भडका उडाला होता. त्याच काळात शेतकरी आंदोलन पेटले होते. तर जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही झाल्या होत्या.

या सर्व निवडणुकांत भाजपने शानदार कामगिरी केली होती. अनेक जिल्हा परिषदा, महानगर पालिका, ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. एकंदरीत तळागाळात भाजप पोहोचविण्यासाठी दानवे यांनी केलेलं संघटन भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात बस्तान बसविण्यासाठी फायदेशीर ठरलं. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळवलेल यशही दानवे यांच्या कार्यकाळातील होतं. लोकसभेनंतर भाजपमध्ये झालेलं इनकमिंक दानवे यांच्या काळातच सुरू झाले होते. त्याचं श्रेय त्यांच नसलं तरी कार्यकाळ त्यांचाच होता याची नोंद घ्यावीच लागेल.

दरम्यान मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत त्यांनी पक्षाला विधानसभेसाठी पाय रचून दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसआधी भाजपने खांदेपालट करत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. तसेच त्यांना जनतेतून निवडणूक लढविण्यास सांगितले. मात्र याच कालावधीत शरद पवारांनी घेतलेला स्टँडमुळ सर्वच गणितं चुकली. शरद पवारांच्या स्टँडचे उत्तर ना चंद्रकांत पाटलांकडे होते ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसने आपलं वैभव टीकून ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपच्या जागा कमी झाल्या.

एकंदरीत दानवे यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर चंद्रकांत पाटलांना योग्य पद्धतीने बॅटींग करायची होती. कारण सर्वकाही आधीच सेट झालेलं होते. मात्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या साथीत भाजपच्या जागा वाढविण्यात अपयश आले. यामुळे दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.