शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:33 IST

दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने शानदार कामगिरी केली होती. मागील पाच वर्षांत भाजपने राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्थेच्या असो वा विधान परिषदांच्या जांगासाठीची लढत असो सगळीकडे चांगली कामगिरी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असताना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे दानवेंच्या कामगिरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रीयमंत्रीपदात रस नसल्यामुळे दानवे यांची केंद्रातून राज्यात रवानगी करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्याच कार्यकाळात मराठा, ओबीसी आणि दलित मोर्चांचा भडका उडाला होता. त्याच काळात शेतकरी आंदोलन पेटले होते. तर जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही झाल्या होत्या.

या सर्व निवडणुकांत भाजपने शानदार कामगिरी केली होती. अनेक जिल्हा परिषदा, महानगर पालिका, ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. एकंदरीत तळागाळात भाजप पोहोचविण्यासाठी दानवे यांनी केलेलं संघटन भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात बस्तान बसविण्यासाठी फायदेशीर ठरलं. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळवलेल यशही दानवे यांच्या कार्यकाळातील होतं. लोकसभेनंतर भाजपमध्ये झालेलं इनकमिंक दानवे यांच्या काळातच सुरू झाले होते. त्याचं श्रेय त्यांच नसलं तरी कार्यकाळ त्यांचाच होता याची नोंद घ्यावीच लागेल.

दरम्यान मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत त्यांनी पक्षाला विधानसभेसाठी पाय रचून दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसआधी भाजपने खांदेपालट करत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. तसेच त्यांना जनतेतून निवडणूक लढविण्यास सांगितले. मात्र याच कालावधीत शरद पवारांनी घेतलेला स्टँडमुळ सर्वच गणितं चुकली. शरद पवारांच्या स्टँडचे उत्तर ना चंद्रकांत पाटलांकडे होते ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसने आपलं वैभव टीकून ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपच्या जागा कमी झाल्या.

एकंदरीत दानवे यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर चंद्रकांत पाटलांना योग्य पद्धतीने बॅटींग करायची होती. कारण सर्वकाही आधीच सेट झालेलं होते. मात्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या साथीत भाजपच्या जागा वाढविण्यात अपयश आले. यामुळे दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.