शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:33 IST

दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने शानदार कामगिरी केली होती. मागील पाच वर्षांत भाजपने राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्थेच्या असो वा विधान परिषदांच्या जांगासाठीची लढत असो सगळीकडे चांगली कामगिरी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असताना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे दानवेंच्या कामगिरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रीयमंत्रीपदात रस नसल्यामुळे दानवे यांची केंद्रातून राज्यात रवानगी करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्याच कार्यकाळात मराठा, ओबीसी आणि दलित मोर्चांचा भडका उडाला होता. त्याच काळात शेतकरी आंदोलन पेटले होते. तर जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही झाल्या होत्या.

या सर्व निवडणुकांत भाजपने शानदार कामगिरी केली होती. अनेक जिल्हा परिषदा, महानगर पालिका, ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. एकंदरीत तळागाळात भाजप पोहोचविण्यासाठी दानवे यांनी केलेलं संघटन भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात बस्तान बसविण्यासाठी फायदेशीर ठरलं. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळवलेल यशही दानवे यांच्या कार्यकाळातील होतं. लोकसभेनंतर भाजपमध्ये झालेलं इनकमिंक दानवे यांच्या काळातच सुरू झाले होते. त्याचं श्रेय त्यांच नसलं तरी कार्यकाळ त्यांचाच होता याची नोंद घ्यावीच लागेल.

दरम्यान मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत त्यांनी पक्षाला विधानसभेसाठी पाय रचून दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसआधी भाजपने खांदेपालट करत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. तसेच त्यांना जनतेतून निवडणूक लढविण्यास सांगितले. मात्र याच कालावधीत शरद पवारांनी घेतलेला स्टँडमुळ सर्वच गणितं चुकली. शरद पवारांच्या स्टँडचे उत्तर ना चंद्रकांत पाटलांकडे होते ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसने आपलं वैभव टीकून ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपच्या जागा कमी झाल्या.

एकंदरीत दानवे यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर चंद्रकांत पाटलांना योग्य पद्धतीने बॅटींग करायची होती. कारण सर्वकाही आधीच सेट झालेलं होते. मात्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या साथीत भाजपच्या जागा वाढविण्यात अपयश आले. यामुळे दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.