शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील भाजपचा 'तो' दावा खोटा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:21 IST

भाजपकडून १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागली होती. त्यालाही अनेक निकष लावले होते.

मुंबई -शेतकरी संपाचा भडका उडाल्यानंतर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या भाजपचा खोटेपणा आता समोर आला आहे. राज्यात सत्तेवर येण्यासाठी सज्ज झालेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावर शेतकरी कर्जमाफी असून पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे.  

भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची योजना आणली होती. मात्र त्यासाठी जाचक अटी आणि शर्ती घातल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेला मुकले. प्रत्येक गावात बोटावर मोजन्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र कर्जमाफीचे श्रेय घेताना सरसकट कर्जमाफी केल्याप्रमाणे घेतले गेले होते. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटींची कर्जमाफी केल्याची घोषणा केली होती. भाजपकडूनही या कर्जमाफीचे मोठे कौतुक करण्यात आले होते. प्रत्यक्षात ही कर्जमाफी केवळ 19 हजार कोटींची ठरली.

देवेंद्र फडणवीस सरकारने ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. मात्र, ती सरसकट दिलेली नव्हती. १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागली होती. त्यालाही अनेक निकष लावले होते. दावा 35 हजार कोटींच्या कर्जमाफीचा होता. मात्र देण्यात आली 19 हजार कोटींची, त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती.