शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील भाजपचा 'तो' दावा खोटा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:21 IST

भाजपकडून १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागली होती. त्यालाही अनेक निकष लावले होते.

मुंबई -शेतकरी संपाचा भडका उडाल्यानंतर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या भाजपचा खोटेपणा आता समोर आला आहे. राज्यात सत्तेवर येण्यासाठी सज्ज झालेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावर शेतकरी कर्जमाफी असून पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे.  

भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची योजना आणली होती. मात्र त्यासाठी जाचक अटी आणि शर्ती घातल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेला मुकले. प्रत्येक गावात बोटावर मोजन्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र कर्जमाफीचे श्रेय घेताना सरसकट कर्जमाफी केल्याप्रमाणे घेतले गेले होते. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटींची कर्जमाफी केल्याची घोषणा केली होती. भाजपकडूनही या कर्जमाफीचे मोठे कौतुक करण्यात आले होते. प्रत्यक्षात ही कर्जमाफी केवळ 19 हजार कोटींची ठरली.

देवेंद्र फडणवीस सरकारने ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. मात्र, ती सरसकट दिलेली नव्हती. १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागली होती. त्यालाही अनेक निकष लावले होते. दावा 35 हजार कोटींच्या कर्जमाफीचा होता. मात्र देण्यात आली 19 हजार कोटींची, त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती.