शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सदाभाऊ खोत यांना संधी देताना भाजपाकडून विश्वासघात, राजू शेट्टींचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:54 IST

‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

सांगली, दि. 19 - ‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. सदाभाऊंना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपने विश्वासघात करून त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

कृषी राज्यमंत्री खोत यांनी शुक्रवारी खा. शेट्टींवर जोरदार टीका केली होती. त्या आरोपांचा शेट्टी यांनी येथे समाचार घेतला. खा. शेट्टी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपबरोबर आघाडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची एक जागा आणि एक मंत्रीपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार विधानपरिषदेसाठी आम्ही संघटनेकडून सदाभाऊ खोत यांच्या नावाची शिफारस केली. मात्र विधानपरिषदेचा अर्ज भरताना भाजपच्या नेत्यांनी विश्वासघात करून भाजपाच्या चिन्हावर त्यांचा अर्ज भरून घेतला. त्यामुळेच सदाभाऊ सध्या डरकाळी फोडत आहेत. मात्र संघटना सोबत नसती तर सदाभाऊ, तुम्हाला भाजपने विधानपरिषद आणि मंत्रिपदावर तरी ठेवले असते का? याचे राज्यातील लाखो शेतकरी साक्षीदार आहेत.  

मंत्रिपदासाठी शेतकºयांचा तरी विश्वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल तर, संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या मंत्रिपदावरून दूर व्हा. पुन्हा खुशाल मंत्री झाल्यास आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल. ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवावी, असे खोत यांचे मत आहे. प्रत्यक्षात मी कोठून निवडणूक लढवावी, यासाठी खोत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी शेतकºयांचा नेता असून, ते सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी तयार आहे. माझ्या निवडणुकांचा सर्व खर्च शेतकरीच करत असल्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही. शेतकरी सांगतील त्या राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन, पण तुमची काय अवस्था होणार आहे, ते आगामी निवडणुकीत शेतकरीच तुम्हाला दाखवून देतील.

संघटनेतील कारभाराबद्दल कार्यकर्तेच उत्तर देतीलस्वाभिमानी शेतकरी संघटनेत हुकूमशाही पध्दतीने कारभार असता तर, सदाभाऊ तुम्ही मंत्री म्हणून राज्यभर मिरवले असता का, हे तुमच्या मनाला तुम्हीच विचारा. संघटनेत कशापध्दतीने कारभार चालतो, याविषयी मी सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच त्यावर उत्तर देणे योग्य ठरेल. मीच संघटनेच्या कारभाराबद्दल सांगून माझी स्तुती केल्याप्रमाणे होईल, असा खुलासाही खा. शेट्टी यांनी केला.

माझ्या भानगडींची सीआयडी चौकशी करामाझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानाचा मोठाही शेतकरी चळवळीतच झालो. मी जर भानगडी, साखर सम्राटांबरोबर दलाली आणि संघटनेचा राजकीय ‘व्यवसाय’ केला असता, तर जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत शेतक-यांनी मला कधीच संधी दिली नसती. शेतकºयांशी गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल तर, भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरुंगात टाका, असे आव्हान खा. शेट्टी यांनी सदाभाऊंना दिले.

सदाभाऊ, तुम्ही साधू संत... हरिभक्त!सदाभाऊ खोत किती स्वच्छ कारभार करतात, याचा अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे. शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या पारदर्शी कारभाराची चांगलीच कल्पना आहे. त्यांचा कारभार साधू संत, हरिभक्ताप्रमाणे कसा चालू आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. सदाभाऊंना माझ्या कारभाराबद्दल बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही खा. शेट्टी यांनी केली.