शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

भाजपा-सेनेसोबत कदापि जाणार नाही!

By admin | Updated: January 19, 2017 00:07 IST

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता येणे शक्य नाही.

मुंबई : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता येणे शक्य नाही. आघाडी, किंवा युती करुनच सत्ता स्थापन करावी लागेल. मात्र, असे असले तरी जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपा, शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. शिवाय, काँग्रेसनेदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात संपादकीय विभागाशी त्यांनी संवाद साधला. नोटाबंदीमुळे सरकारच्या विरोधात कमालीचा रोष असून तो या निवडणुकीत व्यक्त होईल, असा दावाही तटकरे यांनी केला.शरद पवार यांची नरेंद्र मोदींशी असलेली मैत्री आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला देऊ केलेला पाठिंबा, यामुळे राष्ट्रवादीविषयी कायम संभ्रम राहतो. त्याचे काय?- १९९९ सालापासून आमच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे; पण त्या वेळी स्वतंत्र लढूनदेखील आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली. वस्तुत: आमच्यापुढे इतर पर्याय खुले होते. त्या वेळी जे घडले नाही ते आता कसे घडेल? गेल्या दोन वर्षात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या सरकारच्या विरोधात सगळ्यात जास्त भूमिका राष्ट्रवादीने घेतली, ३५ वर्षांनंतर शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरले. प्रदेश राष्ट्रवादीने राज्यभर जेलभरो आंदोलन केले, जर आमची भाजपाशी मैत्री असती, तर हे झाले असते का? शरद पवार यांना केवळ मोदीच नाही देशातले सगळे नेते मान देतात, हे त्यांचे कर्तृत्व आहे; पण बोलणाऱ्यांचे तोंड कसे बंद करणार? जे स्वत: काहीही करत नाहीत आणि दुसऱ्यांची वैगुण्ये दाखवतात.- नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीबाबत सकारात्मक असताना कोणाची अडचण आहे? - आम्ही सकारात्मक आहोत, असे बोलून प्रश्न सुटणार नाही. अशोक चव्हाण यांनी राज्य पातळीवरून आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली असती तर पुढे प्रश्नच उरला नसता; पण आता जिल्हा पातळीवर आघाडी करण्याची भूमिका घेतल्याने त्या त्या जिल्ह्यात जे ठरेल ते ठरेल... नांदेड, पुणे, ठाणे, सोलापूर, सांगली अशा अनेक जिल्ह्यांत आमची बोलणी चालू आहेत. आघाडीच्या विरोधाचा केंद्रबिंदू सातारा आहे. एवढेच मी म्हणेन...- आपला इशारा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे का?सर्वांनाच ते माहीत आहे. स्वच्छ प्रतिमेचा नारा देत ज्यांनी काँग्रेसला ४२ वर आणून ठेवले, त्यांनी दुसऱ्याच्या घराकडे बोट दाखवू नये.- राज्यातील सत्तांतराचे श्रेय नरेंद्र मोदींचे की पृथ्वीराज बाबांचे?- मला जे म्हणायचे ते मी बोललोच आहे...- मुंबईचे घोडे कोणामुळे अडले? इथे काय अडचण आहे?- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दोन महिनेआधी आघाडी करणार नाही, असे जाहीर करून टाकले. त्यानंतरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले; पण आमच्या यादी जाहीर करण्यावर अशोक चव्हाण नाराज झाले. याचा अर्थ निरुपम त्यांचे ऐकत नसावेत, किंवा जे काही घडले त्यापासून चव्हाण अनभिज्ञ असावेत अथवा त्यांचे मुंबई काँग्रेसमध्ये ऐकले जात नसावे. - विरोधी पक्षाची जागा शिवसेनेनेच भरून काढली आहे. तुमची काय भूमिका आहे? - शिवसेनेने विरोधकांची भूमिकादेखील बजावलेली नाही, तर ती त्यांची दुटप्पी भूमिका आहे. सत्तेत राहून सत्तेचे सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सरकारमधल्या मुख्य सहयोगी पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची किंवा नोटाबंदीला विरोध करायचा आणि केंद्रात मंत्रिपदही भूषवायचे हा दुट्टपीपणा आहे. राजकारणात हे फार काळ टिकत नाही. - पिंपरी-चिंचवडमधील तुमचे काही नेते भाजपात गेले, पुण्यात आघाडीत बिघाडी आहे, त्याचे काय?पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणार हे पक्के आहे. कारण अजित पवार यांनी तेथे प्रचंड काम केलेले आहे. नेते जरी गेले तरी जनता आमच्यासोबत आहे. पुण्यात काँग्रेसने ९१-७१ चा प्रस्ताव पाठवला आहे. तर आम्ही त्यांना ११६ जागा राष्ट्रवादीला आणि ४६ जागा काँग्रेसला असा प्रस्ताव पाठवला आहे; पण अशी पत्रापत्री करण्यापेक्षा समोरासमोर बसून चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे.-कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार?-मुद्दे खूप आहेत. भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर येऊन आता अडीच वर्षे झाली आहेत. सरकारविषयी शेतकरी, कष्टकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यात नोटाबंदीच्या निर्णयाची भर पडली आहे. नोटाबंदीमुळे कामगार वर्ग, शेतकरी देशोधडीला लागला आहे. या सर्व मुद्द्यांवर आम्ही सरकारचा पंचनामा करू. (शब्दांकन: अतुल कुलकर्णी)