शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:32 IST

१५२ जागा जिंकण्याच्या बावनकुळेंच्या विधानाने भुवया उंचावल्या

भिवंडी : भाजप २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत १५२ जागा जिंकेल आणि आम्ही लढविलेल्या जागांपैकी ८५ टक्के जागा जिंकू असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात केले. त्यामुळे भाजप १७८ जागा लढणार व शिवसेना व राष्ट्रवादी यांना मिळून ११० जागा सोडणार असल्याचा स्पष्ट तर्क त्यातून निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्या रिसॉर्टमध्ये शिबिर झाले, तेथे ठिकठिकाणी भाजपच्या ‘१५२ प्लस’ या मिशनचे फलक लावले होते. बावनकुळे पत्रपरिषदेत म्हणाले की, राज्यात आमची महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल. आमची तीन पक्षांची युती विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बावनकुळे जेवढ्या जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहेत ते साध्य होण्यासाठी आवश्यक त्या जागा त्यांना लढायला मिळतील असे म्हणत बावनकुळे यांच्या विधानाला बळ दिले.

लोकशाही आहे; बोलण्याचे स्वातंत्र्यही आहे. प्रत्येकजण आपापले आकडे सांगत असतो. बावनकुळे बोलले असतील पण निर्णय तीन पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेतील. आता तीन पक्षांची समन्वय समितीही नेमली आहे. समन्वय नक्कीच वाढेल.- उदय सामंत, मंत्री (शिवसेना)

बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत पण जागावाटपात त्यांना किती अधिकार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे वरिष्ठ नेते भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व ठरवतील. या विषयी अधिक भाष्य करणे योग्य नाही. - सूरज चव्हाण, प्रवक्ते, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना