शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:46 IST

सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली, असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. भाजपकडून सतत होत असलेल्या आरोपाला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले असून, सत्तेचा माज चढलेल्या भाजपने जीभ आवरावी, शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

दानवे म्हणाले की, भाजपचे नेते मस्तवालपणाची भाषा करीत आहेत. महाराष्ट्र हातचा गेल्यानंतर देशातील आदिवासीबहुल असलेल्या झारखंड व देशातील सर्वात उच्चभ्रु दिल्ली या दोन्ही ठिकाणी जनतेने तोंडावर आपटी दिल्यानंतरही शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन निंदानालस्ती करण्याचे प्रकार भाजपा नेते करीत आहे. तर सत्तेची खुर्ची हातून निसटल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर, संभाजीनगर नामांतरावर भाजपची लोकं बेताल वक्तव्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.

संभाजीनगर नामांतरात शिवसैनिकांनी अनेक आंदोलने, तुरुंगवास भोगलेला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात व देशात भाजपचे सरकार असतानाही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत वारंवार मागणी केली. फडणवीस सरकारकडेही वारंवार संभाजीनगर नामांतराची मागणी केली, परंतु मागील सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.