शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:46 IST

सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली, असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. भाजपकडून सतत होत असलेल्या आरोपाला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले असून, सत्तेचा माज चढलेल्या भाजपने जीभ आवरावी, शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

दानवे म्हणाले की, भाजपचे नेते मस्तवालपणाची भाषा करीत आहेत. महाराष्ट्र हातचा गेल्यानंतर देशातील आदिवासीबहुल असलेल्या झारखंड व देशातील सर्वात उच्चभ्रु दिल्ली या दोन्ही ठिकाणी जनतेने तोंडावर आपटी दिल्यानंतरही शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन निंदानालस्ती करण्याचे प्रकार भाजपा नेते करीत आहे. तर सत्तेची खुर्ची हातून निसटल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर, संभाजीनगर नामांतरावर भाजपची लोकं बेताल वक्तव्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.

संभाजीनगर नामांतरात शिवसैनिकांनी अनेक आंदोलने, तुरुंगवास भोगलेला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात व देशात भाजपचे सरकार असतानाही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत वारंवार मागणी केली. फडणवीस सरकारकडेही वारंवार संभाजीनगर नामांतराची मागणी केली, परंतु मागील सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.