शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:49 IST

अनेकांनी झुगारला पक्षादेश; हकालपट्टीनंतरही माघार घेण्यास नकार

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करून रिंगणात उतरलेल्या काही जणांवर भाजप-शिवसेनेने हकालपट्टीची कारवाई केली असली, तरी अद्याप कुणीच माघार घेतली नाही की, पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. उलट, इतर पक्षांच्या पाठिंब्यावर आपल्या उमेदवारीचे घोडे जोरात दामटले आहे.

सर्वच पक्षांत बंडखोरीचे अमाप पीक आले असून, त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आणले आहे. या बंडखोरांना समजवायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वच पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. मतदानाला जेमतेम एकच आठवडा शिल्लक आहे आणि प्रचारासाठी उद्याचा रविवारच अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील शनिवारनंतर प्रचार बंद होईल. त्यामुळे उद्याचा रविवार शक्तिप्रदर्शनाचा असतानाच, अनेक कार्यकर्तेच आता बंडखोरांसोबत दिसू लागल्याने महायुती व महाआघाडीचे नेते अस्वस्थ आहेत.

बंडखोरांमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून भाजपने तुमसरचे आमदार चरण वाघमारे, मीरा-भार्इंदरच्या गीता जैन, उरणचे महेश बालदी, पिंपरी-चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर (जि. लातूर) येथील दिलीप देशमुख आणि सोलापूरचे महेश कोठे या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसनेही माजी आमदार सेवकभाऊ वाघाये (साकोली) आणि रामरतन राऊत या दोघा बंडखोरांना पक्षातून काढून टाकले आहे.

मात्र, तरीही नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), योगेंद्र गोडे (बुलडाणा), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजन तेली (सावंतवाडी), दिलीप कंदकुर्ते (नांदेड द.), राजेंद्र राऊत (बार्शी), राजेश बकाने (वर्धा), संजय देशमुख (दिग्रस), प्रा. राजू तोडसाम (आर्णी), डॉ. रवींद्र आरळी (जत), निशिकांत पाटील (इस्लामपूर), सम्राट महाडिक (शिराळा), शिवाजी जाधव (हिंगोली), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), प्रभाकर सोनवणे (चोपडा), अनिल यादव (शिरोळ), समरजित घाटगे (कागल), शिवाजी पाटील (चंदगड), विजय वहाडणे (कोपरगाव), रत्नाकर पवार (नांदगाव) हे भाजपचे बंडखोर युतीच्या विरोधात दंड थोपटून आहेत.

शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत (कणकवली) व बंडखोर उमेदवार बाबुराव कदम (हदगाव), धनंजय बोडारे (कल्याण पूर्व), नारायण पाटील (करमाळा), अशोक शिंदे (हिंगणघाट), डॉ. विश्वनाथ विणकरे (उमरखेड), शशिकांत पेंढारकर (वाशिम) आदींनीही पक्षाचे आदेश झुगारून घोडे दामटले आहे. पंढरपूर मतदारसंघात राष्टÑवादीचे भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम असल्याने दोन्ही पक्षांत तणाव आहे.बंडखोरांना जागा दाखवून देऊ - मुख्यमंत्रीवाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना टकमक टोकावरून ढकलून दिले जायचे. तशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जनतेचे मत म्हणजेच टकमक टोक असून, त्याची प्रचिती गद्दारांना यंदाच्या निवडणुकीत नक्की येणार आहे. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोबत राहावे. महायुतीत जी जागा ज्या पक्षाला सुटली, त्याच पक्षाचे चिन्ह व झेंड्याखाली सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. असे होत नसेल, तर संबंधितांची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस