शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

भाजपाचा महायुतीचा फॉर्म्युला पक्का, पक्षश्रेष्ठींनीही मारला शिक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 22:56 IST

नवीन फॉर्म्युल्यानुसार भाजप 144, शिवसेना 126 आणि इतर १८ जागांवर लढणार

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. भाजपने १४४ पैकी १00 उमेदवारांची नावेही निश्चित केली असून, ती २९ सप्टेंबर रोजी वा त्यानंतर घोषित केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रदेश भाजपचे संघटन सचिव विजय पुराणिक यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, सरोज पांडे आदी केंद्रीय नेत्यांशी शिवसेनेला सोडावयाच्या जागा व संभाव्य उमेदवारांची नावे यावर प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्याचे भाजपने नक्की केल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती या मित्रपक्षांना मिळून १८ जागा सोडण्यावरही यावेळी एकमत झाले.

मात्र हे चारही पक्ष भाजपचे मित्रपक्ष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना मिळून अधिक जागा मिळणार, हे यातून स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने किमान १0 जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला असला तरी त्या पक्षाला तीन ते पाच जागाच मिळू शकतील, तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक वा दोन जागा सोडल्या जातील, असे कळते. शिवसंग्राम व सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला प्रत्येकी एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसंग्राम व रयत क्रांती कदाचित भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रपक्षांना १0 पेक्षा अधिक जागा मिळणे अवघड आहे, असे समजते. परिणामी शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपचाच अधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत.

या फॉर्म्युल्यास शिवसेनेची तयारी नसल्यास भाजपने सर्व २८८ जागा लढवाव्यात, असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पण मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना १२६ जागांवर तयार होईल, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटत असून, त्यामुळे युती होण्यात अडचणी नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण १२६ पेक्षा अधिक जागा शिवसेनेसाठी सोडू नयेत, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची झालेली अडचण यांमुळे आपण स्वबळावरही बहुमत मिळवू शकतो, अशी भाजप नेत्यांची खात्री आहे. तरीही सन्मानपूर्वक तोडगा म्हणून शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले, असे सांगण्यात आले.गेल्या विधानसभेत काय झाले होते?गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने २६0 जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने २८२ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी ६३ जागांवर विजय मिळविला होता. भाजपला बहुमतासाठी केवळ २३ जागा कमी पडल्याने शिवसेनेशी नंतर युती झाली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019