शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

भाजपा-शिवसेनेने करून नाही, तर भरून दाखवलं : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 10:18 IST

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबई - पावसाच्या बॅटिंगमुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे. यावरूनच आता विरोधकांनी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. मुंबईतील परिस्थितीला महानगरपालिका जवाबदार असून,'भाजप-शिवसनेने करून नाही, तर भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनके भागातील घरांमध्ये पाणी साचले असल्याचे चित्र आहे. यावरून धनंजय मुंडेंनी भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे.सत्तेत असलेल्या भाजप-सेनेचा दावा होता की, कितीही पाऊस झाला तरीही मुंबई ठप्प होऊ देणार नाहीत. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला आहे. तर 'भाजप-शिवसनेने करून नाही, तर तुडुंब भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मलाड सारख्या दुर्घटना होत असून याला फक्त महानगरपालिका जवाबदार असल्याचे आरोप मुंडे यांनी लगावला आहे.