शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:11 IST

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे.

अमरावती - जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत. अशी भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे . अमरावती जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते   ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्टकार्ड राणा यांना पाठवणार आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.

संसदेत भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने, यावर खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला होता. जय श्रीरामाच्या घोषणा संसदेत देऊ नका, त्यासाठी मंदिर आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीराम अशा घोषणा संसदेत देणं योग्य नसल्याची भूमिका राणा यांनी घेतली होती.  त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्धार केला असून, यातील शेकडो पोस्टकार्ड आतापर्यंत पाठवण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे.

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. तर, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून त्या चांगल्याच भडकल्याचं व्हिडिओ वायरल झाल होता. त्यानंतर, भाजपने ममतांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला होता.