शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:11 IST

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे.

अमरावती - जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत. अशी भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे . अमरावती जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते   ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्टकार्ड राणा यांना पाठवणार आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.

संसदेत भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने, यावर खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला होता. जय श्रीरामाच्या घोषणा संसदेत देऊ नका, त्यासाठी मंदिर आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीराम अशा घोषणा संसदेत देणं योग्य नसल्याची भूमिका राणा यांनी घेतली होती.  त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्धार केला असून, यातील शेकडो पोस्टकार्ड आतापर्यंत पाठवण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे.

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. तर, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून त्या चांगल्याच भडकल्याचं व्हिडिओ वायरल झाल होता. त्यानंतर, भाजपने ममतांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला होता.