शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

भाजपाच सेनेचा नंबर १ चा शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 6:37 AM

आपण सत्तेत असलो तरी भाजपा हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे. भाजपाकडून जेथे कुठे चुकीचे घडत असेल तेथे रस्त्यावर उतरा, असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या पदाधिका-यांना दिला. जबाबदारी टाळली तर नव्या लोकांना संधी मिळेल, असा दमही भरला.

अतुल कुलकर्णी ।मुंबई : आपण सत्तेत असलो तरी भाजपा हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे. भाजपाकडून जेथे कुठे चुकीचे घडत असेल तेथे रस्त्यावर उतरा, असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या पदाधिका-यांना दिला. जबाबदारी टाळली तर नव्या लोकांना संधी मिळेल, असा दमही भरला.शिवसेनेचे मंत्री, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवनात झाली. या वेळी अनेक पदाधिकाºयांनी सेनेच्या मंत्र्यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना आॅटोरिक्षा संघटनेच्या कार्यक्रमात एका पदाधिकाºयाने सुनावले होते. तो धागा पकडून ठाकरे म्हणाले, मी पक्षात बेदिली माजू देणार नाही. कधी काय करायचे ते मला कळते. पक्षाच्या पुढील वाटचालीवर बोलताना ठाकरे म्हणाले, (पान ५ वर)(पान १ वरून) येणाºया विधानसभा निवडणुकीसाठी १४५ जागांचे आणि लोकसभेसाठी ३० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करायचेच आहे, ही शेवटीची संधी समजून कामाला लागा असेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेने सुरु केलेली गटप्रमुखांची कल्पनेची भाजपाने चोरी केली व त्याला बूथ प्रमुख नाव देत ती अंमलात आणली. आपण हातावर हात ठेवून बसायचे का? असा सवालही ठाकरे यांनी केला.भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशात ३५० जागांचे लक्ष्य ठेवल्याचा मुद्दा खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला. ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही छोटे छोटे विषय आमच्यावर सोपवा. आम्ही वाट्टेल ते करु पण तुम्हाला मुख्यमंत्री करु. भाजपाने उत्तरप्रदेशात विजयानंतर जल्लोष केला नाही, उलट लगेचच ते दुसºया राज्याच्या निवडणूक तयारीला लागले. त्यांचे हे वागणे आम्ही लक्षात घेणार की नाही, असा सवालही राऊत यांनी केला. राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुखांवर बरसले. आपले जिल्हाप्रमुख काय करतात? त्यांच्यात व कार्यकर्त्यांमध्ये कसलाही समन्वय नाही, पक्ष वाढीची कामे ते करत नाहीत, असा सूर त्यांनी लावला. तीच री ओढत पर्यावरण मंत्री रामदास कदमही जिल्हाप्रमुखांवर घसरले. जिल्हाप्रमुखांना स्वत:साठी तिकिटे पाहिजेत, नंतर स्वत:च्या मुलांना, बायकोलाही तिकीट हवे असते. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकाही जिल्हा प्रमुखाने शेतकºयांच्या कर्जमाफीचे साधे पाच हजार अर्ज देखील भरुन घेतले नाहीत, असे खडसावले. मात्र आमचेच मंत्री आमची कामं करत नाहीत, मग आम्ही कोणाकडे जायचे? असा पलटवार जिल्हाध्यक्षांनी केला. नंतर काही जिल्हाप्रमुखांनी रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत:च्या मुलासाठी काय करतात? याच्या सुरस कथा एकमेकांना ऐकवल्या.>बैठक लाइव्ह होताच ठाकरे चिडले!एका जिल्हाप्रमुखाने बैठकीचे लाइव्ह शूटिंग मोबाइलवरून कोणाला तरी पाठवले. तेथून ते काही न्यूज चॅनेलवर गेले. गुलाबराव पाटील, रामदास कदम आणि खा. संजय राऊत जिल्हाप्रमुखांवरून जे काही बोलत होते त्याची माहिती बाहेर गेल्याचे तेथेच बसलेल्या आदित्य ठाकरे यांना कळाली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आणून देताच ठाकरे भडकले. तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बसला आहात की मीडियाचे? बंद करा मोबाइल... त्यावर पटापट सगळ्यांचे मोबाइल बंद झाले. बैठकीनंतर उद्धव यांनी मंत्री व काही प्रमुख नेत्यांची वेगळी बैठक त्यांच्या केबिनमध्ये घेतली.>कर्जमुक्ती कोणाला? यादी द्याकर्जमुक्तीची नुसतीच हवा आहे. कर्जमुक्ती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ४० लाख शेतकºयांचा सातबारा कोरा होईल आणि ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ होईल, असे म्हटले होते. त्यांनी या सगळ्या शेतकºयांची यादी त्यांच्या नाव आणि पत्त्यासह विधानसभेत ठेवावी म्हणजे आमचा त्यांच्यावरचा विश्वास आणखी वाढेल, असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.