शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भाजपचा स्वबळाचा नारा; स्थानिक पदाधिकाऱ्यांना तयारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:03 IST

शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येकाने कामाला लागावे असे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसनेने एकत्र निवडणूक लढवली असली तरीही, विधानसभेत भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येकाने कामाला लागावे असे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत स्थानिक  कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या जात आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजप-शिवसेनेची युती होणार असे निश्चित समजले जात होते. मात्र आता भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येकाने कामाला लागावे. अशा सूचना भुसावळ भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. त्यामुळे भाजप युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा भाजपच्या गटात पहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच स्थानिक नेत्यांना, युती होणार नाही हे गृहीत धरूनच कामाला लागा व वातावरण निर्मिती करा असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर आली आहे. त्यात भाजपला १६० तर सेनेला ९० जागा दाखविण्यात आल्या आहेत. सहाजिक या जागा बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर लढणे फायद्याचे ठरणार आहे. अर्थात, युती केल्यास, भाजपच्या वाट्याला केवळ १४४ जागा येतील. त्यातही महायुतीतील घटक पक्षांना काही जागा सोडाव्या लागतील. सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या तरी भाजपला बहुमत मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे भाजप ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एकटे लढण्याचा निर्णय घेऊ शकते, असे बोलले जात आहे.