शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

“पृथ्वीराज चव्हाणांनी सरकार घालवले, काँग्रेसची वाताहात होण्यासही जबाबदार”: विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:27 IST

Radhakrishna Vikhe Patil Vs Prithviraj Chavan: सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत पृथ्वीराज चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. यात काहीही तथ्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil Vs Prithviraj Chavan: राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना अन्य मुद्द्यांवरूनही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. सरकार पडण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाडले. मला खात्री आहे की माझे सरकार जर पडले नसते. तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते. मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी निर्णय घेतला होता. सरकार राहिले नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकले नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवले असते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. 

सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले

सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना थेट शब्दांत उत्तर दिले. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला. तसेच काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत, असा थेट हल्लाबोल सुनील तटकरे यांनी केला. 

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण