शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

“पृथ्वीराज चव्हाणांनी सरकार घालवले, काँग्रेसची वाताहात होण्यासही जबाबदार”: विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:27 IST

Radhakrishna Vikhe Patil Vs Prithviraj Chavan: सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत पृथ्वीराज चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. यात काहीही तथ्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil Vs Prithviraj Chavan: राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना अन्य मुद्द्यांवरूनही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. सरकार पडण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाडले. मला खात्री आहे की माझे सरकार जर पडले नसते. तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते. मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी निर्णय घेतला होता. सरकार राहिले नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकले नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवले असते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. 

सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले

सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना थेट शब्दांत उत्तर दिले. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला. तसेच काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत, असा थेट हल्लाबोल सुनील तटकरे यांनी केला. 

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण