शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

राहुल गांधींविरुद्ध भाजपची निदर्शने; माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 08:29 IST

राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हाताला काळ्या फिती बांधून भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपच्या वतीने त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी राज्यभर निदर्शने करण्यात आली. 

राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीत आरक्षण संपविण्याची भूमिका मांडली, या निमित्ताने काँग्रेसचा छुपा अजेंडा उघड झाला असा आरोप भाजपच्या नेत्यांनी आंदोलनादरम्यान केला. आरक्षण संपविणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच आहे. राहुल गांधी यांच्या ओठातून ती व्यक्त झाली, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला येथे आंदोलनाचे नेतृत्व करताना सांगितले. 

जळगावमध्ये  मंत्री गिरीश महाजन, पुणे येथे मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रपूर येथे मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, नंदुरबारमध्ये डॉ. हीना गावित, विजय चौधरी, सोलापूर येथे आमदार सुभाष देशमुख, सांगली येथे आमदार सुधीर गाडगीळ, नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काँग्रेस आक्रमक, रास्ता रोको करीत निषेध 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना भाजप नेते माजी आमदार तरविंदरसिंग मारवा यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा निषेध करीत नागपूर शहर काँग्रेसने शुक्रवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन केले. यावेळी मारवा यांना अटक करण्याची मागणी करीत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. 

घोषणाबाजी

राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हाताला काळ्या फिती बांधून भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी हे चैत्यभूमीवर  जाऊन माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन राज्यभर असेच सुरू राहील, असे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केले.  

राहुल गांधी तसे कधीही बोलले नाहीत : थोरात

आरक्षण बंद करणार असे काँग्रेस नेते राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत. त्यामुळे भाजपचे नेते नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. राहुल गांधींची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूची आहे. उलटपक्षी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी आणि सर्व समाज घटकांना न्याय द्यावा अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, भाजप स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी करीत आहे, असे थोरात यांनी एक्स समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

भाजपचे नेते हे सत्यता पडताळून पाहण्याची कोणतीही तसदी घेत नाहीत. त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपच्या या फेक नॅरेटिव्हला सर्वसामान्य जनता भुलणार नाही. भाजपच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला आता माहिती झाले आहे, असेही  थोरात यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी