शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यातच अडकून ठेवण्याची भाजपची खेळी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:56 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील गच्छंती झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागली. नवनिर्वाचित थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना जिल्ह्यातूनच कडवे आव्हान मिळणार, अशी शक्यता आहे. एकूणच थोरातांना जिल्ह्यात अडकून ठेवण्याची योजना तर भाजपने आखली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी विरोधीपक्षनेते आणि आता भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची जणूकाही जबाबदारीच घेतली आहे. मुलाला भाजपमधून खासदार केल्यानंतर विखे पाटील देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात २०० तर अहमदनगरमधून १२-० अशी युतीची स्थिती राहिल असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या थोरात यांच्यासमोर अहमदनगरमध्येही चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे.

सध्या तरी भाजपनेते विखे पाटील काँग्रेसमधील नाराज आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यासाठी दुवा ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

नगरमध्ये सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. सहाजिकच पक्षांतर करून आल्यानंतर लगेच मंत्रीपद मिळविणाऱ्या विखे पाटलांवर नगरमध्ये युतीचं संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगरचेच असल्यामुळे विखेंसाठी पक्षाकडून मिळालेले टार्गेट तितकेसे सोपे नाही, हे देखील तेवढंच खरं.