शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यातच अडकून ठेवण्याची भाजपची खेळी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:56 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील गच्छंती झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागली. नवनिर्वाचित थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना जिल्ह्यातूनच कडवे आव्हान मिळणार, अशी शक्यता आहे. एकूणच थोरातांना जिल्ह्यात अडकून ठेवण्याची योजना तर भाजपने आखली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी विरोधीपक्षनेते आणि आता भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची जणूकाही जबाबदारीच घेतली आहे. मुलाला भाजपमधून खासदार केल्यानंतर विखे पाटील देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात २०० तर अहमदनगरमधून १२-० अशी युतीची स्थिती राहिल असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या थोरात यांच्यासमोर अहमदनगरमध्येही चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे.

सध्या तरी भाजपनेते विखे पाटील काँग्रेसमधील नाराज आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यासाठी दुवा ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

नगरमध्ये सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. सहाजिकच पक्षांतर करून आल्यानंतर लगेच मंत्रीपद मिळविणाऱ्या विखे पाटलांवर नगरमध्ये युतीचं संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगरचेच असल्यामुळे विखेंसाठी पक्षाकडून मिळालेले टार्गेट तितकेसे सोपे नाही, हे देखील तेवढंच खरं.