शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यातच अडकून ठेवण्याची भाजपची खेळी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:56 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील गच्छंती झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागली. नवनिर्वाचित थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना जिल्ह्यातूनच कडवे आव्हान मिळणार, अशी शक्यता आहे. एकूणच थोरातांना जिल्ह्यात अडकून ठेवण्याची योजना तर भाजपने आखली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी विरोधीपक्षनेते आणि आता भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची जणूकाही जबाबदारीच घेतली आहे. मुलाला भाजपमधून खासदार केल्यानंतर विखे पाटील देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात २०० तर अहमदनगरमधून १२-० अशी युतीची स्थिती राहिल असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या थोरात यांच्यासमोर अहमदनगरमध्येही चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे.

सध्या तरी भाजपनेते विखे पाटील काँग्रेसमधील नाराज आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यासाठी दुवा ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

नगरमध्ये सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. सहाजिकच पक्षांतर करून आल्यानंतर लगेच मंत्रीपद मिळविणाऱ्या विखे पाटलांवर नगरमध्ये युतीचं संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगरचेच असल्यामुळे विखेंसाठी पक्षाकडून मिळालेले टार्गेट तितकेसे सोपे नाही, हे देखील तेवढंच खरं.