शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्याविरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची कार्यकर्त्यांवर वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 17:35 IST

पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेतला असून राज्यात सत्तांतर होणार नाही, असं गृहित धरलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी पक्षांतरावर जोर दिलेला दिसत आहे. आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या नेत्यांना मोठ्या आदराने सामावून घेतले जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे.

मागील अनेक वर्षे विरोधात काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये सत्तेत पुनरागमन करण्यात यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उदयानंतर देशात भाजपचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे. भाजपने अनेक राज्यात सत्ता मिळवली. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले, त्यावेळी अनेक वर्षे भाजपमध्ये घालवणाऱ्या नेत्यांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. परंतु, तेव्हापासूनच भाजपमध्ये विरोधी पक्षांतील नेत्यांची लागलेली रांग वाढतच गेली.

२०१४ मध्ये झालेल्या विजयात भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली. या नेत्यांनी विरोधी बाकावर बसून दिलेल्या लढ्यामुळे भाजप-शिवसेनेने राज्यात पाय रोवले. अनेक संकटात या नेत्यांनी भाजपवरची निष्ठा ढळू दिली नाही. मतदार संघातील सत्ताधारी नेत्यांना सळो की पळो करून सोडले त्यांच्यावर कायम टीका केली. परंतु, येणारा काळ या निष्ठावान नेत्यांसाठी त्रासदायक ठरणार, असंच दिसत आहे.

स्थानिक पातळीवर उभी हयात ज्या नेत्यांवर टीका करण्यात घालवली, आज त्यांचाच जयजयकार करण्याची वेळी या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर येणार आहे. पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच. तर भाजपने देखील विरोधी पक्षांतील किती नेत्यांना पक्षात सामावून घ्यायचे हे निश्चित करावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.