शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

ज्यांच्याविरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची कार्यकर्त्यांवर वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 17:35 IST

पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेतला असून राज्यात सत्तांतर होणार नाही, असं गृहित धरलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी पक्षांतरावर जोर दिलेला दिसत आहे. आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या नेत्यांना मोठ्या आदराने सामावून घेतले जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे.

मागील अनेक वर्षे विरोधात काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये सत्तेत पुनरागमन करण्यात यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उदयानंतर देशात भाजपचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे. भाजपने अनेक राज्यात सत्ता मिळवली. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले, त्यावेळी अनेक वर्षे भाजपमध्ये घालवणाऱ्या नेत्यांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. परंतु, तेव्हापासूनच भाजपमध्ये विरोधी पक्षांतील नेत्यांची लागलेली रांग वाढतच गेली.

२०१४ मध्ये झालेल्या विजयात भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली. या नेत्यांनी विरोधी बाकावर बसून दिलेल्या लढ्यामुळे भाजप-शिवसेनेने राज्यात पाय रोवले. अनेक संकटात या नेत्यांनी भाजपवरची निष्ठा ढळू दिली नाही. मतदार संघातील सत्ताधारी नेत्यांना सळो की पळो करून सोडले त्यांच्यावर कायम टीका केली. परंतु, येणारा काळ या निष्ठावान नेत्यांसाठी त्रासदायक ठरणार, असंच दिसत आहे.

स्थानिक पातळीवर उभी हयात ज्या नेत्यांवर टीका करण्यात घालवली, आज त्यांचाच जयजयकार करण्याची वेळी या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर येणार आहे. पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच. तर भाजपने देखील विरोधी पक्षांतील किती नेत्यांना पक्षात सामावून घ्यायचे हे निश्चित करावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.