शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 09:52 IST

महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

रत्नागिरी: आताच्या घडीला जीएसटी (GST) अनुदान रकमेवरून राज्यातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadhi) ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यांचे सर्व पैसे दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत असले, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळे पैसे मिळाले नसल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यातच आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर भाजपने खोचक टीका केली असून, बुद्धिवान माणसाकडे हे खाते असावे, असा टोला लगावला आहे. 

केंद्र सरकारकडून २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा, यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीसाठी या एकूण भरपाईपैकी महाराष्ट्राला १४,१४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, तरीही सगळी रक्कम मिळाली नसल्याचे राज्याचे म्हटले आहे. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं

अजित पवार म्हणतात, GSTचे ५० टक्के पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र ५ लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या ३०/४० हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खाते असावे, असे नितेश राणे यांनी म्हटले. याशिवाय, सगळी चर्चा GSTवर पण ठाकरे सरकारने २ वर्षात २ लाख कोटीचे कर्ज महाराष्ट्रावर लादले आहे, या विषयावर कोण बोलत नाही. २ वर्षात महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत, अशी टीकाही नितेश राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली होती. ३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की, पुन्हा आज १ जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार? राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असेही म्हटले आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीAjit Pawarअजित पवारNilesh Raneनिलेश राणे