शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर बारामतीत आल्या तर...; गोपीचंद पडळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:37 IST

५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले.

बारामती - भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं लोकसभा मिशन हाती घेतलंय. त्यात निर्मला सीतारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिलीय. निर्मला सीतारामन या बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणारही नाही. ऑपरेशन कसं झाले आणि भाजपाचा खासदार दिल्लीला कसा गेला अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, २२,२३ आणि २४ सप्टेंबरला निर्मला सीतारामन महाराष्ट्रात येणार म्हटल्यावर सुप्रिया सुळे सातत्याने सरकारवर टीका करायला लागल्यात. तुम्ही चिंता करू नका. ५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे. पुणे जिल्ह्यात भाजपाचं संघटन कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवलं. २०१९ ला विश्वासघातानं सरकार बनवलं. जेव्हा एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. हिसकावून घ्यायचं तेव्हा बारामतीकरांना आनंद असतो. जनतेने निवडून दिलेल्या सरकारप्रमाणे शपथविधीनंतर पहिल्या अधिवेशनात त्यावेळी सुप्रिया सुळे वरमाई असल्यासारख्या फिरत होत्या. राज्यात गणपती बसले आहेत. आता अनेकठिकाणी विसर्जन सुरू आहे. गणपती दरवर्षी येत असतात. परंतु २०२४ ला पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आवर्जुन संघटनेच्या कामाची सुरुवात करायला बारामतीत आलेत असं पडळकरांनी म्हटलं. 

हा पवारांचा बालेकिल्ला नाही तर टेकडीबारामती लोकसभेत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे आणि हे परिवर्तन निश्चित होणार आहे. हे फार अवघड काम नाही. हा किल्ला, बालेकिल्ला म्हटलं जातं पण ही पवारांची टेकडी आहे. केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे. राष्ट्रवादीचं राजकारण पोलिसांवर चालतं. तहसिलदार, प्रांत, तलाठी यांच्यावर राजकारण चालतं. त्यापलीकडे राजकारण जात नाही असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला. 

...तर दुसरा पर्याय नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगाच्या पाठिवर ताठ मानाने उभा आहे. नरेंद्र मोदींना देशभरातील अनेक मतदारांनी २ वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यात बारामती मतदारसंघ नव्हता त्याची खंत येथील मतदारांना वाटत आहे. त्या भावना लोकं आम्हाला बोलून दाखवतात. हीच खंत वाटून घ्यायची नसेल तर २०२४ ला कमळ चिन्हावरील बटण दाबून लोकसभेला भाजपाचा खासदार पाठवावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी कार्यकर्त्यांना केले. 

राष्ट्रवादीचं खरे दुखणं हेच सत्तेत असताना विरोधात बोलणाऱ्यांवर मोक्के लावले गेले. चळवळीत असणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होतात. माझ्यावर किती गुन्हे नोंद केलेत. महिलांच्या शरीरावर जेवढे दागिने असतात तेवढे राजकीय नेत्यांवर गुन्हे हे आपले दागिने असतात. त्याशिवाय राजकारणात पुढे जाऊ शकत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा प्रस्थापित व्यवस्थेविरोधात ताठमानेने लढतो आणि जिंकतोही. एकनाथ शिंदेंसारख्या मराठा समाजातील व्यक्तीने इतके बंड केले आणि त्यांच्यामागे भाजपानं १०५ आमदारांची ताकद देत मुख्यमंत्रिपदी बसवलं हे राष्ट्रवादीचं खरे दुखणं आहे असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा