शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:15 IST

Maharashtra Govt Decision on Heat Stroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे श्रीसदस्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Govt Decision on Heat Stroke: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर, अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. या घटनेनंतर आता सरकारला उपरती झाली असून, सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या संख्येवरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहे. सरकार खरा आकडा लपवत आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यातच आता सरकारने बॅकफूटवर जात एक मोठा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाची वेळ निवडण्यातच आयोजकांनी आणि सरकारने चूक केल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना याची माहिती दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्देश

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. याबाबत बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना घडेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, म्हणून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची दाहक स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या जागेत कोणताही कार्यक्रम घेऊ नये, हा चांगला निर्णय आहे. जनतेने या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 

प्रयत्न केले, पण जे घडले ते दुर्दैवी

ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, त्या ठिकाणी असे काही घडेल, याची १ टक्काही कल्पना नव्हती. प्रयत्न सर्व केले गेले, पण जे घडले ते दुर्दैवी आहे. विरोधक त्यांचे राजीनामा मागण्याचे काम करत आहेत. परंतु, अशा घटनेच्या पुनरावृत्ती होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, यासाठी सरकारने जीआर काढला आहे. आम्ही पुढे काळजी घेऊ, असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा