शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भाजप नेत्यांचीच बंडाची तयारी !

By रवींद्र देशमुख | Updated: December 13, 2019 10:56 IST

माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना अनेकदा लक्ष्य केले होते. 

- रवींद्र देशमुख 

मुंबई - सत्ता जाताच भारतीय जनता पक्षामधील मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी एकनाथ खडसे आणि त्यांच्यानंतर आता पंकजा मुंडे आणि प्रकाश मेहता यांनी उचल घेतली आहे. यामध्ये माजीमंत्री विनोद तावडे हे समोर आले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेत आपण आहे, त्यातच आनंदी असल्याचे स्पष्ट केले. मात्र खडसे, मुंडे आणि मेहता या तीन नेत्यांनी बंडखोरी केली नसली तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणाऱ्या तिन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेत आलेल्या भाजपच्या 2014 ते 2019 या कालावधीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि प्रकाश मेहता हे मंत्रीपदी विराजमान होते. त्याच काळात या तिन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होेते. यामध्ये सर्वप्रथम नंबर लागला तो, एकनाथ खडसे यांचा, पुण्यातील एमआयडीसीत त्यांनी जमीन घेतल्याचा आणि दाऊदशी संपर्क असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश करण्यात आला नाही. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट देखील नाकारण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज आहेत.

माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना अनेकदा लक्ष्य केले होते. 

दरम्यान खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे प्रकाश मेहता यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविता विकासकाला झुकते माप दिल्याचा आरोप त्यांचावर होता. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मेहता यांची मंत्रीपदावरून उचलबांगली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तिकीट देखील नाकारण्यात आले. त्यामुळे ते देखील नाराज होते. अर्थात बंड न करता पक्ष नेतृत्वाविरुद्ध भूमिका घेणारे खडसे, मुंडे आणि मेहता तिन्ही नेत्यांवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.