शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांकडून अवास्तव आश्वासनांवर अंकुश ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:45 IST

भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षातील नेत्यांकडून मनमोकळ्यापणाने आश्वासने देण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी देऊ अशी आश्वासने विरोधक देत आहेत. त्याचवेळी भाजपकडून आश्वासनांवर अकुंश ठेवण्यात येत असल्याचे दिसून येते.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील अनेक आश्वासने देण्यात आली होती. लोकसभेला भाजपकडून वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले. तर राज्याच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन दिले होते.

या आश्वासनांपैकी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ होते. राज्य सरकारने न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडून मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र सरकारला धनगर आरक्षण आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात अपयश आले. तर कर्जमाफीचा लाभही बोटांवर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना मिळाला. यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

निवडून येण्याचा विश्वासविधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापन करू, असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की.