शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कटुता नाही! मोदी-पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:37 IST

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात २५ मिनिटं खलबतं; भेटीवर मुनगंटीवारांचं अतिशय सूचक विधान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याबद्दलचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीवर माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

राजकीय मतभेद असले तरीही मनभेद असता कामा नये अशी आपली राजकीय संस्कृती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनला नितीन गडकरी उपस्थित होते आणि आज पंतप्रधान मोदी, शरद पवारांची भेट झाली. लढाई विचारांची असते. मात्र मोदी आणि पवार एकमेकांचा आदरच करतात, असं मुनगंटीवारांनी एबीपी माझाला सांगितलं.

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते तुरुंगात असताना, अनेक नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडत असल्यानं कटुता निर्माण झाली असताना पवार आणि मोदी यांची भेट होते. त्यामुळे या भेटीकडे कसं पाहायचं असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या संबंधांत कटुता आलेली नाही. शिवसेना आणि भाजपच्या संबंधांमध्ये मात्र खूप कटुता आल्याचं ते म्हणाले.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मतदारांनी युतीला कौल दिला. मात्र शिवसेनेनं बेईमानी केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही निवडणूक लढलोच नव्हतो. त्यांनी आमच्याशी बेईमानी केलेलीच नाही. त्यामुळे कटुतेचा प्रश्न येत नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.

केंद्रात मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं सरकार आहे. राज्यातही भाजप-शिवसेनेचं सरकार यावं यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. तसेच शिवसैनिकही भाजपच्या उमेदवारांसाठी राबले. मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी बेईमानी केली, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते केंद्रीय तपास यंत्रणांमुळे तुरुंगात असूनही भाजप-राष्ट्रवादीत कटुता नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा अर्थ राष्ट्रवादी पक्ष असा होत नाही. ते दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी नाही. भाजप-शिवसेना संबंध कटुता आली आहे. राष्ट्रवादी-भाजप संबंधांमध्ये कटुता आलेली नाही, या विधानाचा मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार