शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कटुता नाही! मोदी-पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:37 IST

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात २५ मिनिटं खलबतं; भेटीवर मुनगंटीवारांचं अतिशय सूचक विधान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याबद्दलचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीवर माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

राजकीय मतभेद असले तरीही मनभेद असता कामा नये अशी आपली राजकीय संस्कृती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनला नितीन गडकरी उपस्थित होते आणि आज पंतप्रधान मोदी, शरद पवारांची भेट झाली. लढाई विचारांची असते. मात्र मोदी आणि पवार एकमेकांचा आदरच करतात, असं मुनगंटीवारांनी एबीपी माझाला सांगितलं.

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते तुरुंगात असताना, अनेक नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडत असल्यानं कटुता निर्माण झाली असताना पवार आणि मोदी यांची भेट होते. त्यामुळे या भेटीकडे कसं पाहायचं असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या संबंधांत कटुता आलेली नाही. शिवसेना आणि भाजपच्या संबंधांमध्ये मात्र खूप कटुता आल्याचं ते म्हणाले.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मतदारांनी युतीला कौल दिला. मात्र शिवसेनेनं बेईमानी केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही निवडणूक लढलोच नव्हतो. त्यांनी आमच्याशी बेईमानी केलेलीच नाही. त्यामुळे कटुतेचा प्रश्न येत नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.

केंद्रात मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं सरकार आहे. राज्यातही भाजप-शिवसेनेचं सरकार यावं यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. तसेच शिवसैनिकही भाजपच्या उमेदवारांसाठी राबले. मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी बेईमानी केली, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते केंद्रीय तपास यंत्रणांमुळे तुरुंगात असूनही भाजप-राष्ट्रवादीत कटुता नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा अर्थ राष्ट्रवादी पक्ष असा होत नाही. ते दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी नाही. भाजप-शिवसेना संबंध कटुता आली आहे. राष्ट्रवादी-भाजप संबंधांमध्ये कटुता आलेली नाही, या विधानाचा मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार