शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले…

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 25, 2020 13:53 IST

“दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसं येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसं सांगू?” असं दानवे यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची 'ज्योतिषी' म्हणून खिल्ली उडवली होती.या राज्यातील कारभारावर जनता नाराज आहे - दानवेदोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसे येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसे सांगू? - दानवे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची 'ज्योतिषी' म्हणून खिल्ली उडवली होती. यावर दानवे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांनी एका एका कार्यक्रमात बोलताना राज्यात येत्या दोन महिन्यांत भाजप सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला होता. यासंदर्भात पवारांना विचारले असता, "त्यांनी सांगितले आहे तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता दानवे यांनी उत्तर दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, “माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, एक गोष्ट मला समजते, की या राज्यातील कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.” 

यावेळी दानवे यांना पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याच्या दाव्यासंदर्भात विचारले असता, “दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसे येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसे सांगू?” असे दानवे म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार? - रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्‍यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचे चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितले आहे, तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असे पवार म्हणाले होते.

काय म्हमाले होते रावसाहेब दानवे -राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षातील वेगळ्या विचारांचे नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाचा कोणाला पायपूस नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा