शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Maharashtra Politics: “अब्दुल सत्तार जाणीवपूर्वक, मुद्दामहून करतात असे नाही, तो त्यांचा मूळ स्वभाव”: विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:47 IST

Maharashtra News: जो प्रकार घडला, तो योग्य नव्हता हे अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. अभद्र भाषेत अब्दुल सत्तार यांनी विधान केले. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माफी मागितली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही आक्रमक भूमिका मांडत आहेत. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना, ते मुद्दामहून किंवा जाणीवपूर्वक असे करत नसल्याचे म्हटले आहे. 

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांचा मूळ स्वभाव सांगितला. सत्तार हे माझे जवळचे मित्र आहे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे, त्यांना मागेही सांगितलं होतं पण ते जाणीवपूर्वक करतात असे नाही. मुद्दाम करतात असे नाही त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. यापूर्वी सल्ला दिला होता आत्ताही सांगेन की, आपण आता राज्यकर्ते आहोत. जपून बोलले पाहिजे, जो काही प्रकार घडला होता, तो योग्य नव्हता असे आता अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 

कोणत्याही प्रकारे याचे समर्थन होऊ शकत नाही

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून ते योग्य नसल्याचे म्हटले आहे. हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु, कायदा हातात घेणे हे सवंग लोकप्रियतेसाठी केले आहे. सत्ता गेल्याचे वैफल्यच यातून दिसते, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. 

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. कोणीही महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा. परंतु संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना असे शब्द वापरण्याची सुट दिली होती का, तमाम निषेध गॅंगने???, अशी विचारणा करत, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAbdul Sattarअब्दुल सत्तार