शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics: “अब्दुल सत्तार जाणीवपूर्वक, मुद्दामहून करतात असे नाही, तो त्यांचा मूळ स्वभाव”: विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:47 IST

Maharashtra News: जो प्रकार घडला, तो योग्य नव्हता हे अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. अभद्र भाषेत अब्दुल सत्तार यांनी विधान केले. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माफी मागितली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही आक्रमक भूमिका मांडत आहेत. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना, ते मुद्दामहून किंवा जाणीवपूर्वक असे करत नसल्याचे म्हटले आहे. 

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांचा मूळ स्वभाव सांगितला. सत्तार हे माझे जवळचे मित्र आहे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे, त्यांना मागेही सांगितलं होतं पण ते जाणीवपूर्वक करतात असे नाही. मुद्दाम करतात असे नाही त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. यापूर्वी सल्ला दिला होता आत्ताही सांगेन की, आपण आता राज्यकर्ते आहोत. जपून बोलले पाहिजे, जो काही प्रकार घडला होता, तो योग्य नव्हता असे आता अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 

कोणत्याही प्रकारे याचे समर्थन होऊ शकत नाही

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून ते योग्य नसल्याचे म्हटले आहे. हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु, कायदा हातात घेणे हे सवंग लोकप्रियतेसाठी केले आहे. सत्ता गेल्याचे वैफल्यच यातून दिसते, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. 

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. कोणीही महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा. परंतु संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना असे शब्द वापरण्याची सुट दिली होती का, तमाम निषेध गॅंगने???, अशी विचारणा करत, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAbdul Sattarअब्दुल सत्तार