शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:02 IST

Maharashtra News: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून, पुन्हा एकदा भाजपने यावरून टीका केली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात असून, विविध सभांमधून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका करताना दिसत आहे. यातच भाजपकडून पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला राहुल गांधींना लगावण्यात आला आहे. 

तामिळनाडूतून निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकवण्याची चर्चा होती. यादरम्यान हाणामारीचे प्रकरण समोर आले आहे. टीएनसीसीचे खजिनदार आणि नांगुनेरीचे आमदार रुबी आर मनोहरन यांच्या समर्थकांमध्ये ही हिंसक हाणामारी झाली. टीएनसीसी मुख्यालय सत्यमूर्ती भवन येथे झालेल्या हाणामारीत पक्षाचे किमान चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच घटनेचा दाखला देत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर हल्लाबोल केला आहे. 

...आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये बातमी तामिळनाडू मधली आहे पण काँग्रेसच्या "भारत जोडो" यात्रेचे पितळ उघडे पाडणारी आहे... तिथे दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि इथे अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना लगावला आहे. 

दरम्यान, भारत जोडो यात्रेत महागाई, बेरोजगारीसह अर्थव्यवस्थेचा प्रश्नही महत्वाचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेची घसरगुंडी मोदी सरकारला थांबवता येत नाही, जनता महागाईने त्रस्त आहे पण पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर गप्प आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. पण सरकार ते मान्यच करत नाही. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या वल्गना करणारे आता ७५ हजार नोकऱ्या देत आहेत, ही तरुणांची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAtul Bhatkhalkarअतुल भातखळकर