शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लोकसभेला किती जागा? विधानसभाही महायुतीत लढणार?; फडणवीस स्पष्टच बोलले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:49 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत, असा सल्ला फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढवणार आहोत, अशी घोषणा केली. तसंच आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, "महाविजय २०२४ हे अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाच्या दृष्टीने आपण खालपर्यंत संघटनेची रचना तयार केली आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, मात्र कोणीही अतिआत्मविश्वास ठेवता कामा नये. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत. तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढवणार आहेत. तुमच्या मनात असतील तितक्या जागा आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका," असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पदाधिकाऱ्यांना आवाहन

"विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी जोडणारी यात्रा आहे. हा फक्त संकल्प यात्रेचा रथ नसून नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचत आहे, जी गॅरंटी फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. त्यामुळे ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ही यात्रा ज्या भागात जात आहे, तिथं योग्य पद्धतीने स्वागत होत आहे का, लोक उपस्थित राहात आहेत का, हे पाहणं भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षपूर्वक केलं पाहिजे," असं आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

"महाराष्ट्राला मोदींचं आकर्षण"

"महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना नरेंद्र मोदींचं आकर्षण आहे. अनेकदा असं सांगितलं जातं की मोदींचं आकर्षण फक्त हिंदी भाषिक राज्यातील लोकांना आहे. मात्र हे खोटं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदींचं आकर्षण नसतं तर लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये आपण ४२ जागा जिंकू शकलो नसतो. यातील काही अशा जागा आपण जिंकल्या की ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता," असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.  

दरम्यान, राहुल गांधी हे विरोधक म्हणून आपल्याला मिळालेलं वरदान आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabhaलोकसभा