शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

लोकसभेला किती जागा? विधानसभाही महायुतीत लढणार?; फडणवीस स्पष्टच बोलले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:49 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत, असा सल्ला फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढवणार आहोत, अशी घोषणा केली. तसंच आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, "महाविजय २०२४ हे अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाच्या दृष्टीने आपण खालपर्यंत संघटनेची रचना तयार केली आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, मात्र कोणीही अतिआत्मविश्वास ठेवता कामा नये. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत. तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढवणार आहेत. तुमच्या मनात असतील तितक्या जागा आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका," असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पदाधिकाऱ्यांना आवाहन

"विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी जोडणारी यात्रा आहे. हा फक्त संकल्प यात्रेचा रथ नसून नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचत आहे, जी गॅरंटी फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. त्यामुळे ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ही यात्रा ज्या भागात जात आहे, तिथं योग्य पद्धतीने स्वागत होत आहे का, लोक उपस्थित राहात आहेत का, हे पाहणं भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षपूर्वक केलं पाहिजे," असं आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

"महाराष्ट्राला मोदींचं आकर्षण"

"महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना नरेंद्र मोदींचं आकर्षण आहे. अनेकदा असं सांगितलं जातं की मोदींचं आकर्षण फक्त हिंदी भाषिक राज्यातील लोकांना आहे. मात्र हे खोटं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदींचं आकर्षण नसतं तर लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये आपण ४२ जागा जिंकू शकलो नसतो. यातील काही अशा जागा आपण जिंकल्या की ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता," असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.  

दरम्यान, राहुल गांधी हे विरोधक म्हणून आपल्याला मिळालेलं वरदान आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabhaलोकसभा