शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लोकसभेला किती जागा? विधानसभाही महायुतीत लढणार?; फडणवीस स्पष्टच बोलले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:49 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत, असा सल्ला फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढवणार आहोत, अशी घोषणा केली. तसंच आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, "महाविजय २०२४ हे अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाच्या दृष्टीने आपण खालपर्यंत संघटनेची रचना तयार केली आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, मात्र कोणीही अतिआत्मविश्वास ठेवता कामा नये. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत. तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढवणार आहेत. तुमच्या मनात असतील तितक्या जागा आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका," असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पदाधिकाऱ्यांना आवाहन

"विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी जोडणारी यात्रा आहे. हा फक्त संकल्प यात्रेचा रथ नसून नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचत आहे, जी गॅरंटी फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. त्यामुळे ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ही यात्रा ज्या भागात जात आहे, तिथं योग्य पद्धतीने स्वागत होत आहे का, लोक उपस्थित राहात आहेत का, हे पाहणं भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षपूर्वक केलं पाहिजे," असं आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

"महाराष्ट्राला मोदींचं आकर्षण"

"महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना नरेंद्र मोदींचं आकर्षण आहे. अनेकदा असं सांगितलं जातं की मोदींचं आकर्षण फक्त हिंदी भाषिक राज्यातील लोकांना आहे. मात्र हे खोटं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदींचं आकर्षण नसतं तर लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये आपण ४२ जागा जिंकू शकलो नसतो. यातील काही अशा जागा आपण जिंकल्या की ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता," असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.  

दरम्यान, राहुल गांधी हे विरोधक म्हणून आपल्याला मिळालेलं वरदान आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabhaलोकसभा