शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

“हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे”; चंद्रकांत पाटलांचे मोहन भागवतांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 17:48 IST

मोहन भागवतांच्या वक्तव्यात कुठेही हिंसाचार नाही. पण हिंदू आता मार खाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी येणाऱ्या २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच साकार होईल. याला रोखणारे कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर भाष्य केले आहे. 

परमपूज्यनीय मोहन भागवत यांच्या म्हणण्यावर मी काही म्हणणे योग्य नाही. पण ताकद इतकी वाढवावी लागते की ती परत वापरावीच लागत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. हिंदुत्व हा शब्द तुम्ही पूजा पद्धतीशी जोडू नका, संघाला पूजा पद्धतीशी संबंधित अभिप्रेत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे. हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही, हिंदू या शब्दातच सर्व धर्मांना समान भाव मिळणे आहे, असे पाटील यांनी नमूद केले. 

सगळ्या जगाचे एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू

हिंदू राष्ट्राचा विचार केला तर जिथे हिंदू संस्कृती होती. मंदिरे आहेत, हिंदू विचाराने जीवनपद्धती आहेत असे खूप लांबपर्यंत जावे लागेल. आता त्या सगळ्यांना भारताच्या राजकीय नेतृत्वाखाली आणण्याची संघाची कल्पना नाही. संघाची भूमिका मोहन भागवतांनीच मांडली पाहिजे. मोहन भागवत यांच्या कल्पनेत, विचारात, मांडणीत अशा प्रकारे सगळ्या जगाचं एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू असे नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

संघाला आपली ताकद वापरावीच लागत नाही

संघाला आपली ताकद वापरावीच लागत नाही. संघ ताकदच अशी निर्माण करतो जी वापरावली लागत नाही, असे पाटील म्हणाले. तसेच मोहन भागवतांनी हातात दंडुके घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले की, मोहन भागवतांच्या वक्तव्यात कुठेही हिंसाचार नाही. पण हिंदू आता मार खाणार नाही, सहन करणार नाही. मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हे तर कोणीही म्हणेल. हिंदू हा एक विचार आहे, जीवन जगण्याचा व्यवहार आहे. त्याअर्थी सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून त्यांना हिंदू अपेक्षित आहेत. त्याला आडवे येणारे या अर्थाने त्यांनी म्हटले आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघchandrakant patilचंद्रकांत पाटीलMohan Bhagwatमोहन भागवत