शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:34 IST

Maharashtra Assembly Election Result 2024: आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. यानंतर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर मोठं वक्तव्य केलंय.

Maharashtra Assembly Election Result 2024: आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती २२१ जागांवर तर महाविकास आघाडी ५५जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. यानंतर उद्धव ठाकरेंबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. "समोर महायुती २२२ आणि महाविकास आघाडी ५६ दाखवत आहेत, शिवाय इतर मधले किमान ७ महायुतीसोबत येणारेत म्हणजेच २२९ असताना उद्धवजी सोबत येणं हा महायुतीच्या बाजूने होणाऱ्या प्रयत्नाचा भाग असू शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणले.

"उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला आणि त्यांना जर हे आपलं नैसर्गिक जग नाही हे जाणवलं, तर त्याचा निर्णय आमचं वरिष्ठ नेतृत्व करेल," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं "जर त्यांनी पुढाकार घेतला तर त्याचा निर्णय आमची केंद्रीय संसदीय समिती घेईल. २०१९ मध्ये लोकांनी कौल दिला असतानाही त्यांनी वेगळी वाट धरली. त्याचं अनेकांनाही दु:ख झालं तसं मलाही झालं. महाराष्ट्राचं भलं भाजप आणि शिवसेनेने २०१४ मध्ये जे केलं ते २०१९ लाही झालं असतं. निकालही पाहायची गरज लागली नसती. पण त्यांनी वेगळी वाट धरली. त्यांनी स्वत:चंही नुकसान करून घेतलं, पक्षाचंही नुकसान केलं, राज्याचंही नुकसान केलं. भाजपला काहीच फरक पडत नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

Maharashtra Election Results 2024

आम्ही समाधानी...

"भाजप हा असा पक्ष जो २ लाही समाधानी आणि ३०३ लाही समाधानी. जर ते याचा पश्चाताप होऊन येणार असले तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही सामान्य माणसाला आनंदच होईल, कारण ती नैसर्गिक युती आहे. पण पुलाखालून इतकं पाणी  गेलंय, इतके शिव्या शाप, वाटेल ते बोलणं झालंय. राऊत बोलले ते कोणी मनावर घेतलं नाही, त्यांना ते कामच दिल्याचे ते म्हणाले. जेव्हा विनोद तावडेंबद्दल चौकशी करा असं उद्धव ठाकरे बोलले तेव्हा दु:ख झालं. माझ्या आधीपासून तावडे मातोश्रीवर जातात, यांचे मित्र, राजकारणात जाऊन असं वक्तव्य केलं. मला पवारांचं वक्तव्य आवडलं. मी त्यांना ४० वर्षांपासून ओळखतो, मला माहिती घ्यावी लागेल असं ते म्हणाले. तावडेंनीही त्यांचे आभार मानले. आपण वाहत चाललोय हे कोणत्या दिशेनं वाहत चाललोय हे पाहावं," असं पाटील यावेळी म्हणाले.

सुरुवातीच्या कलात सुपडा साफ

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले त्यात आतापर्यंत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. भाजपाच्या १३२ जागा, शिवसेनेच्या ५४ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १८ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १९ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १९ जागांवर आघाडी आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील