शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सामान्य मुंबईकरांची पाकीटमार, श्रीमंतांना भरघोस सूट, महापालिका दिवाळखोरीत; भाजपचा आरोप

By देवेश फडके | Updated: January 30, 2021 13:48 IST

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले.

ठळक मुद्देआशिष शेलार यांची महापालिका कारभारावर जोरदार टीकाश्रीमंत महापालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणल्याचा दावाधनदांडग्यांना प्रिमियरमध्ये सूट देऊन सामान्यांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले. या कारभारामुळे श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून, ०१ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५% उत्पन्न जमा झाले आहे. श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणले. हीच का ती तुमची, करून दाखवलेली कामगिरी, अशी विचारणा आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. 

सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता

बिल्डरांना प्रीमियममध्ये ५०% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात ५०% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी १००% सूट, एवढेच नव्हे तर, ताजलाही सूट देण्यात आली. सत्ताधिशांनी धनदांडग्यांवर सवलतींचा पाऊस पाडला आहे आणि दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीची लूट केली जात आहे, असा दावा आशिष शेलार यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केला आहे.

तिसऱ्या एका ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात की, सामान्य मुंबईकरांना २०१५ ते २०२० पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व ५०० चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार आहे. मदत म्हणून काही दिले तर नाहीच, याउलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरू आहे, असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला. 

राज्यात गुंतवणुकीला चालना मिळावी. तसेच अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावेत, या दृष्टिकोनातून सरकारने काही योजना राबवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विकासकांना प्रिमियममध्ये सूट देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारMumbaiमुंबई