शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य मुंबईकरांची पाकीटमार, श्रीमंतांना भरघोस सूट, महापालिका दिवाळखोरीत; भाजपचा आरोप

By देवेश फडके | Updated: January 30, 2021 13:48 IST

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले.

ठळक मुद्देआशिष शेलार यांची महापालिका कारभारावर जोरदार टीकाश्रीमंत महापालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणल्याचा दावाधनदांडग्यांना प्रिमियरमध्ये सूट देऊन सामान्यांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले. या कारभारामुळे श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून, ०१ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५% उत्पन्न जमा झाले आहे. श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणले. हीच का ती तुमची, करून दाखवलेली कामगिरी, अशी विचारणा आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. 

सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता

बिल्डरांना प्रीमियममध्ये ५०% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात ५०% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी १००% सूट, एवढेच नव्हे तर, ताजलाही सूट देण्यात आली. सत्ताधिशांनी धनदांडग्यांवर सवलतींचा पाऊस पाडला आहे आणि दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीची लूट केली जात आहे, असा दावा आशिष शेलार यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केला आहे.

तिसऱ्या एका ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात की, सामान्य मुंबईकरांना २०१५ ते २०२० पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व ५०० चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार आहे. मदत म्हणून काही दिले तर नाहीच, याउलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरू आहे, असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला. 

राज्यात गुंतवणुकीला चालना मिळावी. तसेच अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावेत, या दृष्टिकोनातून सरकारने काही योजना राबवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विकासकांना प्रिमियममध्ये सूट देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारMumbaiमुंबई