शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:33 IST

BJP Replied Rahul Gandhi: हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम; पण, पराभव झाला की, काहीतरी सबब शोधायची, रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, अशी टीका भाजपाने केली आहे.

BJP Replied Rahul Gandhi: 'मतचोरी' आणि बिहारमधील मतदार याद्यांविरुद्धची लढाई आता संसदेच्या सभागृहांतून रस्त्यावर आली आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या पक्षाचे नेते व खासदार या मोर्चात उत्स्फूर्तपणे उतरले. विरोधी पक्षाच्या जवळपास ३०० खासदारांसह नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाच्या माध्यमातून कूच केली. हातात मोठमोठे बॅनर्स आणि मुखात आक्रमक घोषणा यामुळे राजधानीत संसद परिसर दुमदुमला. मोर्चेकऱ्यांचे टार्गेट होते निवडणूक आयोगाचे कार्यालय. परंतु, पोलिसांनी ट्रान्सपोर्ट भवनजवळच मोर्चा अडवला आणि नेत्यांना ताब्यात घेतले. यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातच भाजपानेराहुल गांधींवर टीका केली. 

राहुल गांधी म्हणजे खोट्या, फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच आहे, हे आता वारंवार सिद्ध होते आहे. वर्षानुवर्षे निवडणुका हरल्यानंतर असे फेक नॅरेटीव्हचा आधार घेत थयथयाट करायचा व त्यालाच सत्य मानत जनतेच्या माथी मारायचे हीच गांधी घराण्याची स्वत:ला सर्वापेक्षा वेगळे व श्रेष्ठ समजणारी हुकूमशाही मानसिकता. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे सांगत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला.

राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे

एक म्हणजे याआधी महाराष्ट्रात कधी ७० लाख तर कधी १ कोटी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या कथित मतचोरीचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फेटाळून लावले. दुसरे म्हणजे भारतीय लष्कराबद्दल च्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून खडे बोल. तिसरे म्हणजे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. चौथे म्हणजे सावरकर, हिंडेनबर्ग. रा स्व संघ यावर नुसतेच आरोप न्यायालयात काहीच सिद्ध करता आले नाही. राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे - हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम, पण पराभव झाला की, काही तरी सबब शोधायची, त्यांची रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, मग फेक न्यूज. म्हणूनच, राहुल गांधी फेक न्यूजचे बादशहाच, आणि त्याला सतत मुजरे करणारे काँग्रेसी हुजरे!, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षांची ही निदर्शने म्हणजे देशात अराजक व अस्थिरता पसरविण्याचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. भाजपा मुख्यालयात बोलताना त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले. तर, केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'इंडिया' आघाडी लोकशाहीला बदनाम करत असल्याचे सोशल मीडियावर नमूद केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग