शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:33 IST

BJP Replied Rahul Gandhi: हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम; पण, पराभव झाला की, काहीतरी सबब शोधायची, रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, अशी टीका भाजपाने केली आहे.

BJP Replied Rahul Gandhi: 'मतचोरी' आणि बिहारमधील मतदार याद्यांविरुद्धची लढाई आता संसदेच्या सभागृहांतून रस्त्यावर आली आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या पक्षाचे नेते व खासदार या मोर्चात उत्स्फूर्तपणे उतरले. विरोधी पक्षाच्या जवळपास ३०० खासदारांसह नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाच्या माध्यमातून कूच केली. हातात मोठमोठे बॅनर्स आणि मुखात आक्रमक घोषणा यामुळे राजधानीत संसद परिसर दुमदुमला. मोर्चेकऱ्यांचे टार्गेट होते निवडणूक आयोगाचे कार्यालय. परंतु, पोलिसांनी ट्रान्सपोर्ट भवनजवळच मोर्चा अडवला आणि नेत्यांना ताब्यात घेतले. यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातच भाजपानेराहुल गांधींवर टीका केली. 

राहुल गांधी म्हणजे खोट्या, फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच आहे, हे आता वारंवार सिद्ध होते आहे. वर्षानुवर्षे निवडणुका हरल्यानंतर असे फेक नॅरेटीव्हचा आधार घेत थयथयाट करायचा व त्यालाच सत्य मानत जनतेच्या माथी मारायचे हीच गांधी घराण्याची स्वत:ला सर्वापेक्षा वेगळे व श्रेष्ठ समजणारी हुकूमशाही मानसिकता. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे सांगत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला.

राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे

एक म्हणजे याआधी महाराष्ट्रात कधी ७० लाख तर कधी १ कोटी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या कथित मतचोरीचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फेटाळून लावले. दुसरे म्हणजे भारतीय लष्कराबद्दल च्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून खडे बोल. तिसरे म्हणजे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. चौथे म्हणजे सावरकर, हिंडेनबर्ग. रा स्व संघ यावर नुसतेच आरोप न्यायालयात काहीच सिद्ध करता आले नाही. राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे - हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम, पण पराभव झाला की, काही तरी सबब शोधायची, त्यांची रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, मग फेक न्यूज. म्हणूनच, राहुल गांधी फेक न्यूजचे बादशहाच, आणि त्याला सतत मुजरे करणारे काँग्रेसी हुजरे!, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षांची ही निदर्शने म्हणजे देशात अराजक व अस्थिरता पसरविण्याचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. भाजपा मुख्यालयात बोलताना त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले. तर, केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'इंडिया' आघाडी लोकशाहीला बदनाम करत असल्याचे सोशल मीडियावर नमूद केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग