शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

केव ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

By admin | Updated: July 23, 2016 03:14 IST

केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे.

विक्रमगड : महिला सरपंच आरक्षणानुसार सरपंचपदाच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत तालुक्यातील केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे. त्यामुळे ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे.तालुक्यात सध्यस्थितीत ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांचे वातावरण सर्वत्र सुरु असून ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती जुलैमध्ये संपत आहेत, त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १३ ग्रामपंचायतीवर भाजपाने आपली बाजी मारली आहे.केव ग्रामपंचायतीवर ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या हा विजय भाजपासाठी मोठा आहे. या दरम्यान भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय औसरकर यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व खासदार चिंंतामण वनगा तसेच जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर गुरुवार विक्रमगड तालुक्यांत भाजपाने भरघोस यश संपादन केले आहे. विक्रमगड तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर फक्त भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अजून अनेक ग्रामपंचायती सरपंच निवड बाकी आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पावडे, उपसभापती मधुकर खुताडे, महेश आळशी, सुशील औसरकर, सुधाकर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)>खोडाळा ग्रामपंचायत शिवसेनेकडेचमोखाडा : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसे व खोडाळा ग्रामपंचायतीत सेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. आसे ग्रामपंचायतीत सरपंचपदी रुखमनी कोरडे, उपसरपंचपदी प्रकाश वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खोडाळा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी प्रभाकर पाटील आणि उपसरपंचपदी चंद्रमानी मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.>राजकीय रस्सीखेच शिगेलाराज्यात आणि केंद्रात जरी भाजप आघाडीचे राज्य असले तरी ग्रामपंचाय सरपंच उपसरपच निवडणूकीमध्ये आपले कार्ड चालविणे भाजपाला तेवढे सोपे जात नाही.जिल्ह्यामध्ये शहरी भागात शिवसेनेच काम चांगले असतांना तर ग्रामिण भागामध्ये माकप व श्रमजीवी संघटना रुजलेली असतांना राजकीय रस्सीखेच शिगेला पोहचली आहे.>आबिटघर ग्रामपंचायत सेना-माकपकडेवाडा : तालुक्यातील आबिटघर या ग्रामपंचायतीवर शिवसेना-माकपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून सरपंचपदी मारूती मोरघा यांची तर उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येऊन सत्ता स्थापन केली आहे. सदस्यपदी हर्षला पाटील, आरती पाटील, प्रकाश धनगरे, विनायक वेहळे हे निवडून आले आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. कुयलू ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने आपला झेंडा फडकवला असून सरपंचपदी योगिनी कुसल व उपसरपंचपदी राजेश सवर यांची निवड झाली आहे . या ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे कुणबी सेनेची सत्ता होती. तर बिलावली खरीवली या ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता स्थापन केली असून सरपंचपदी रंजिता जाधव यांची तर उपसरपंचपदी महेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.