शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडतंय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 31, 2017 08:36 IST

अयोध्येत राम मंदिराची उभारणी हे अजूनही फक्त आश्वासनच आहे तसेच शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगारनिर्मिती या दोन्ही वचनांचे आता राममंदिर झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 31 - शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगार निर्मितीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून  भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेने सुद्धा या दोन मुद्यांवर जनतेकडे मते मागितल्याची त्यांनी कबुली दिली आहे. 
 
अयोध्येत राम मंदिराची उभारणी हे अजूनही फक्त आश्वासनच आहे  तसेच शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगारनिर्मिती या दोन्ही वचनांचे आता राममंदिर झाले आहे अशी टीका उद्धव यांनी केली आहे. आश्वासने आणि वचने म्हणजे निवडणुका जिंकण्याचे जुमलेच झाले असतील तर जनतेचा निवडणुकांतील भाषणे आणि राजकारण्यांवरचा विश्वास उडून जाईल असे लेखात म्हटले आहे. 
 
कर्जमुक्ती व रोजगार देणे शक्य नाही असे सांगणे हे परखड असले तरी आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडण्यासारखे आहे अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे. बेरोजगारीचा स्फोट होत आहे. अशावेळी कर्जमुक्ती व रोजगार देणे शक्य नाही असे सांगणे हे परखड असले तरी आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडण्यासारखे आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी व बेरोजगारीच्या प्रश्नांवर आम्ही तितक्याच परखडपणे यापुढेही बोलत राहू. मोदींचे सरकार ही या देशातील जनतेची शेवटची आशा आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्यातील सरकारवर जबाबदारी जास्त आहे. शेवटी राजकारणी कोणत्याही पक्षाचे असोत, सत्तेत आल्यावर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या कर्तव्यपूर्तीची सुबुद्धी ईश्वर सर्वच राजकारण्यांना देवो!
 
- भारतीय जनता पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत परखड शब्दांत बजावले आहे की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही. गडकरी हे स्पष्ट आणि सत्य बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे वागणे गोलमाल नसते. त्यांनी कर्जमाफीविषयी भूमिका स्पष्ट करून गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो, पण आता कर्जमाफी देणे शक्य नाही. श्री. गडकरी यांनी मागच्या सरकारचा हवाला दिलाच आहे. यापूर्वीही कर्जमाफी झालीच होती, मात्र त्यातून प्रश्न सुटला काय? असा प्रश्न त्यांनी उभा केला आहे. त्याच वेळी त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील आणखी एका जहाल सत्याची वाच्यता केली आहे. सरसकट सगळ्यांना म्हणजे सवाशे कोटी जनतेला नोकऱ्यां देणे अशक्यच असल्याचे अमितभाईंनी सांगून टाकले आहे. सत्य हे कटू असते. ते पचवायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांनी हे कडू घोट पचवायलाच हवेत. 
 
- निवडणुकीच्या प्रचारात दिलेली सर्व आश्वासने ही पूर्ण करण्यासाठी नसतात, असे एक विधान मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते व त्यांना गुन्हेगार ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे करण्याचे काम शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केले होते, पण आज आम्ही शिंदे यांना त्या पिंजऱयातून मुक्त करीत आहोत. कारण राजकारणात ‘सब घोडे बारा टके’ हे स्वकीयांनीच सिद्ध केले आहे. त्यामुळे एकट्या शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱयात का उभे करायचे! खरे म्हणजे शेतकऱ्यांंची कर्जमुक्ती व बेरोजगारीचा प्रश्न हा थट्टेचा व थुंकी लावण्याचा विषय होऊ नये. निवडणुकीपूर्वी रोजगारनिर्मितीची व संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा आपण केलीच होती. प्रत्यक्ष नितीन गडकरी किंवा अमित शहा यांच्या मुखातून हे आश्वासन बाहेर पडले नसेलही, पण शिवसेना-भाजपने मते मागण्यासाठी हे ‘वचन’ जाहीर सभांतून व जाहीरनाम्यातून दिलेच होते, पण या दोन्ही वचनांचे आता ‘राममंदिर’ झाले आहे. 
 
- आश्वासने आणि वचने म्हणजे निवडणुका जिंकण्याचे जुमलेच झाले असतील तर जनतेचा निवडणुकांतील भाषणे आणि राजकारण्यांवरचा विश्वास उडून जाईल. जनतेला शब्द देतान शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिलात तर माघार घेऊन नका, या शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारांशी आम्ही बांधलेलो आहोत. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ही सत्ताधाऱ्यांंची भूमिका असायला हवी. पण शेतकरी व बेरोजगारांची तोंडे ही आश्वासनांची पाने पुसण्यासाठीच असतात की काय, असाच धक्का भाजप नेत्यांच्या ‘सत्यवदना’मुळे जनतेला बसू शकतो. राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे. बेरोजगारीचा स्फोट होत आहे. अशावेळी कर्जमुक्ती व रोजगार देणे शक्य नाही असे सांगणे हे परखड असले तरी आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडण्यासारखे आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते व विस्मृतीचे झटके देते. आम्ही हे आरोप सत्तेतील मित्रपक्षावर करू इच्छित नाही, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी व बेरोजगारीच्या प्रश्नांवर आम्ही तितक्याच परखडपणे यापुढेही बोलत राहू. मोदींचे सरकार ही या देशातील जनतेची शेवटची आशा आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्यातील सरकारवर जबाबदारी जास्त आहे. शेवटी राजकारणी कोणत्याही पक्षाचे असोत, सत्तेत आल्यावर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या कर्तव्यपूर्तीची सुबुद्धी ईश्वर सर्वच राजकारण्यांना देवो!